
Supreme Court Final Decision : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याच्या विधानसभाध्यक्षांकडे आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे.
येत्या 13 मे रोजी शनिवारी दुपारी 12 वाजता 'मातोश्री'वर ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची बैठक उद्धव ठाकरे घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाची पुढील रणनीती कशी असणार? याबाबतची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाकरे गटातील सर्व आमदाररांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश 'मातोश्री'वरून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीत ठाकरे गटाची पुढील रणनीती ठरवणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वाचून दाखवला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या बहुमत चाचणीसह इतर निर्णयावर जोरदार ताशेरे ओढले.
याबरोबरच शिंदेंनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलं. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याच्या विधानसभाध्यक्षांकडे सोपवला आहे.
(Edited By - Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.