BMC Election News: ठाकरेंना दिलासा की शिंदेंना झटका? 'बीएमसी'च्या प्रभागरचनेवर उच्च न्यायालय आज काय निर्णय देणार?

Mahavikas Aaghadi Vs Shide Fadnavis : आघाडी सरकारच्या काळात मुंबई महापालिकेची केलेली २३६ प्रभागसंख्या शिंदे फडणवीस सरकारने सत्तेत येताच २२७ केली होती.
BMC Election
BMC ElectionSarkarnama

Mumbai News: महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिकेची वार्ड संख्या 227 वार्ड वरुन 236 करण्यात आली होती.मात्र, मागील वर्षी जून महिन्यात राज्यात मोठा राजकी भूकंप होऊन आघाडी सरकार कोसळले. आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली.

त्यात मुंबई महापालिकेच्या वाढविलेल्या वॉर्ड संख्येच्या निर्णयाचा देखील समावेश होता. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे.

BMC Election
Uddhav Thackeray News: हिंडेनबर्ग रिपोर्ट खोटा तर सत्यपाल मलिकांच्या प्रश्नांना उत्तरं का दिली नाही; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

आघाडी सरकारने मुंबई महापालिकेची वाढविलेली 236 प्रभागसंख्या पुन्हा शिंदे फडणवीस सरकारने 227 केली होती. आता निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे नेते राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी (दि.17) उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्यायमूर्ती एम डब्ल्यू चंदवाणी यांचं द्विसदस्यीय खंडपीठ प्रभागरचनेबाबत हा निकाल देण्याची शक्यता आहे.

मुंबई प्रभागरचना(BMC Election) आणि पुनर्रचनेसंदर्भातील सुनावणी 18 जानेवारीला पूर्ण झाली होती. यावेळी न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. ठाकरे गटाच्या प्रभागरचनेबाबतच्या याचिकेला राज्य सरकारकडून तीव्र विरोध करण्यात आला असून ती फेटाळण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

BMC Election
Nitin Raut News : नितीन राऊतांची गैरहजेरी खटकली, दोन दिवसांपूर्वी केली होती भाजप नेत्यांची स्तुती !

निवडणूक आयोगाची भूमिका काय?

राज्य निवडणूक आयोगानं आम्ही कुठल्याही अधिसूचनेला नाही, तर कायद्याला बांधील असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकार जसे आदेश जारी करत त्यानुसार आम्ही काम करतो, अशी भूमिका निवडणूक आयोगानं न्यायालयात मांडली होती.

याचिकाकर्त्याचा दावा काय ?

महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या वाढवून केलेल्या 236 प्रभागसंख्येनुसार निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र त्यावेळी त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. पण रातोरात सरकार बदललं आणि नवीन सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या प्रभागरचेनबाबतच्या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा प्रभागरचना ही 227 केली. पण या शिंदे फडणवीस सरकारच्या एका निर्णयानं निवडणूक आयोग तसेच महापालिका प्रशासनाची सर्व मेहनत वाया गेल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com