मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही 300 पेक्षा जास्त जागा जिंकल्या : फडणवीसांचा दावा

Gram Panchayat Election : 'शिंदे गट खरी शिवसेना आहे. तिकडे शिल्लकसेना आहे,' अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

मुंबई : आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे (Grampanchayat Election) निकाल लागले आहेत. निकालामध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर दिसून येत आहे. यात शिंदे गटालाही (BJP & Shinde Group) गटालाही ग्रामीण भागाने कौल दिलेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली. 'तीनशे पेक्षा अधिक ठिकाणी आम्हाला विजय मिळाला आहे, असा फडणवीसांनी दावा केला आहे.

यावेळी फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला. 'शिंदे गट जे म्हणताय, ती खरी शिवसेना आहे. तिकडे शिल्लकसेना आहे,' अशी बोचरी टीका फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. फडणवीस म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तीनशे पेक्षा अधिक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप असे आम्ही निवडून आलेलो आहोत. हा विजय म्हणजे भविष्याची नांदी आहे.'

Devendra Fadnavis
अकोल्यात भाजपला धक्का; शिवसेनेची मुसंडी, अपक्षांचे वर्चस्व!

दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. रविवारी (१८ सप्टें) मतदान झालं. आज (सोमवारी) सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होऊन, निकाल लागले आहेत. 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पदासाठी रविवारी मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल लागले आहेत. त्यापैकी जवळपास 51 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com