Varun Sardesai On Deshpande Attack : देशपांडे हल्ल्याबाबत वरुण सरदेसाईंचे मोठे विधान : ‘हल्लेखोर आमच्या पक्षाचे असू शकतील. पण...’

अशा चिल्लर लोकांवर बोलायची मला फार गरज वाटत नाही.
Sandeep Deshpande-Varun Sardesai
Sandeep Deshpande-Varun Sardesai Sarkarnama

मुंबई : हल्लेखोर आमच्या पक्षाचे असू शकतील. पण, मला त्याबद्दल काही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांच्या हल्लाप्रकरणी दिली आहे. विशेष म्हणजे विधानसभेत काल बोलताना नीतेश राणे यांनी सरदेसाई यांचे नाव घेतले होते. त्यामुळे सरदेसाईंचे विधान महत्वपूर्ण ठरते. (Varun Sardesai's reaction to the attack on Sandeep Deshpande)

मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुंबईत हल्ला झाला. त्याप्रकरणी भारतीय कामगार सेनेच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Sandeep Deshpande-Varun Sardesai
Vikhe Patil : नगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देणे भूषणावहच : विखे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली

वरुण सरदेसाई म्हणाले की, हल्लेखोर आमच्या पक्षाचे असू शकतील. पण, मला त्याबद्दल काही कल्पना नाही. कोण काय करतं, त्या प्रकारावर वारंवार प्रतिक्रिया देऊन एखाद्या घटनेला मोठे करण्याची मला गरज वाटत नाही.

आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोण काय बोलतं. एखादा व्यक्ती बोलल्यानंतर, तो व्यक्ती काय एवढा मोठा नाही की तो बोलल्यावर आम्ही त्यावर प्रतिक्रिया द्यावी. अशा चिल्लर लोकांवर बोलायची मला फार गरज वाटत नाही. स्वतःच्या प्रसिद्धीकरता, कदाचित सुरक्षा मिळविण्यासाठी हे केले असेल. त्यांचा तो विषय आहे. आम्हाला आमचा पक्ष, संघटना वाढविण्यात स्वारस्य आहे, असा टोलाही सरदेसाई यांनी लगावला.

Sandeep Deshpande-Varun Sardesai
Bacchu Kadu Vs Shivsena 'गद्दारी'वरून बच्चू कडू आक्रमक : ‘हमारी खुद की पानटपरी है! कहाँ लगाना है, हम देखेंगे...’

वरुण सरदेसाई म्हणाले की, कसब्यात भारतीय जनता पक्षाला जी हार पत्करावी लागली. तो विषय दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न या घटनेच्या माध्यमातून असू शकतो, अशी मला दाट शक्यता वाटते.

Sandeep Deshpande-Varun Sardesai
Bacchu Kadu News :आमच्यासारख्याला वाटतंय की शिवसेनेत पुन्हा गेलं पाहिजे : बच्चू कडू असं का म्हणाले?

काय म्हणाले होते आमदार नीतेश राणे?

मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी काही लोकांची नावेही घेतली आहेत. ती नावे उद्या पोलिसांच्या तपासात बाहेर येतील. पण, गेल्या काही महिन्यांपासून हे संदीप देशपांडे वरुण सरदेसाई नावाच्या व्यक्तीसंदर्भाने सातत्याने आरोप करत आहेत. गेल्या सरकारमध्ये या सरदेसाई यांची काय ताकद होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. देशपांडे हे मुंबई महापालिकेचे अनेक प्रश्न मांडत होता. मग त्यानंतर त्यांच्यावर हल्ला होतो. नेमकं वरुण सरदेसाई आणि संबंधित लोकांचा यामध्ये काय सहभाग आहे का, याबाबत चौकशी झाली पाहिजे. नाहीतर उद्या त्यांचाही दिशा सॅलियान, मनसुख हिरेन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्यासारखं होऊ शकतं, त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com