'हॉटेलचे बिल एकनाथ शिंदे यांनी भरले आणि मुख्यमंत्री ठाकरे झाले!'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका
Narayan Rane, Uddhav Thackeray,Eknath Shinde
Narayan Rane, Uddhav Thackeray,Eknath Shindesarkarnama

मुंबई : हे अपयशी ठरले की यांना दोन वाक्य आठवतात हिंदुत्व आणि मुंबई तोडण्याचा डाव. हिंदुत्ववादी म्हणणारे आता राष्ट्रवादीच्या कुशीत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली.

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत सभा घेतली होती, त्या सभेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसाठी काय केले. त्यांची साधी विचारपूरस देखील केली नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळी आदल्या दिवशी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून नाव चालू होते. मात्र, बाशिंग बांधून हे गेले. हॉटेलचे बिल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भरले आणि मुख्यमंत्री हे झाले, असा दावाही राणे यांनी केला.

Narayan Rane, Uddhav Thackeray,Eknath Shinde
दीपक केसरकर म्हणाले, खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही...

राणे म्हणाले, कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवनारे एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मात्र, बाळासाहेबांना त्रास कुणी दिला नाही. फक्त पुत्राने त्रास दिला. मुलगा म्हणून साहेबाना यांनी विश्वासदेखील दिला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाची टिंगल करतात. देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलतात पण तुमचा चेहरा आरश्यात बघा आम्ही तुम्हाला काय म्हणायचे, अशी टीका केणी केली होती का? देवेंद्र फडणवीस आमचा चेहरा आहेत. लोक ऐकायला येतात असा चेहरा आहे. मुंबई जागतीक शहर बनवणार म्हणाले होते. मात्र, यांनी बकाल केले. पालिकेत भ्रष्टाचाराची दुर्गंधी आहे, कुठे नसेल इतका भ्रष्टाचार पालिकेत केला आहे.

Narayan Rane, Uddhav Thackeray,Eknath Shinde
मुख्यमंत्र्यांची सभा ऐकताना राणे घड्याळ लावून बसले होते! त्यांनीच सांगितलं कारण

बाबरी पाडली तेव्हा आमचे शिवसैनिक होते तेव्हा तुम्ही होता का? तुम्ही मराठी तरुणांच्या हातात दगड दिले. मुख्यमंत्री यांना जे शिवसैनिक मेले त्यांना भेटायला वेळ नाही. हे म्हणतात तुकडे तुकडे करू तुम्हाला काय भाजी वाटली काय? भाजप हातात दगड देत नाही विचार देते. याचमुळे भाजप देशात सर्वात मोठा पक्ष आहे. तुम्ही भाजपच्या अंगावर येवू नका, मी आता भाजपमध्ये आहे, असा इशारा राणे यांनी दिला. तसेच बाबरी पडली तेव्हा मी तिथे गेलो नव्हतो, गर्दीत जाऊन चेंग्रून जाऊ नये म्हणून तिथे गेलो नव्हतो. उद्धव ठाकरे त्यावेळी अदृश्य होते, ते राजकारणात नव्हते, असेही राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com