केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी पुण्यातील 'त्या' दुर्घटनेची आठवण करून देत दिला सल्ला...

Kapil Patil : कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या दोन दिवसांत कमानी पडल्याचा घटना घडल्या आहेत.
Central Minister Kapil Patil News
Central Minister Kapil Patil NewsSarkarnama

डोंबिवली : शहरात उत्सवादरम्यान कमानी लावताना महापालिकेने काही मार्गदर्शक सूचना दिल्या पाहिजेत. कमानीचे मजबुतीकरण आणि सुरक्षितता याविषयी त्या असाव्यात. महापालिकेने परमिशन देतानाच त्यामध्ये काही अटी घातल्या पाहिजेत.

महापालिकेने अटी घातल्यानंतर जो कमान लावतो त्यानेही त्या पाळल्या पाहिजे. हा दोघांचा विषय आहे नाहीतर महापालिकेने कंडिशन घालायचे आणि आपण आहे तसेच करायचं तर हे चुकीचं आहे, असे वक्तव्य केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी डोंबिवली येथे केले. पुणे दुर्घटनेत अशा अपघातात लोकांचा मृत्यू झाला होता. त्यातून आपण शिकले पाहिजे, असे सांगत त्या घटनेची आठवण त्यांनी करून दिली. (Central Minister Kapil Patil Latest News)

Central Minister Kapil Patil News
शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; भाजप युवा मोर्चाचा नेता गळाला...

कल्याण शीळ रोड रुंदीकरणात बाधित शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नसल्याने सर्व पक्षिय युवा मोर्चाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी भूमीपुत्रांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

ठाणे, दिवा यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या दोन दिवसांत कमानी पडल्याचा घटना घडल्या आहेत. यावर त्यांनी पुणे येथे बॅनरची कमान पडून काही लोकांचा मृत्यू झाला होता, त्याची आठवण करून देत म्हणाले, कमान अंगावर पडून एखाद्याचा जर मृत्यू झाला तर यापेक्षा दुर्भाग्य दुसर काही नाही. परमिशन देतानाच त्यामध्ये काही कंडिशन घातल्या पाहिजे.

ते म्हणाले की, हा राज्याचा विषय असल्याने मी ठोस आश्वासन देऊ शकत नाही. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. स्थानिक खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करून यावर तोडगा काढू, असे आश्वासन यावेळी मंत्री पाटीलांनी भूमीपुत्रांना दिले.

Central Minister Kapil Patil News
Sudhir Mungantiwar : ‘वंदे मातरम्’ हा फक्त नारा नाही, तर राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास..

दरम्यान, हॅलो ऐवजी आता वंदे मातरम् म्हणावे लागणार या विषयी राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याविषयी पाटील म्हणाले की, भारताच्या संस्कृतीबद्दल कोणाच्या मनात दुमत असण्याचे कारण नाही. वंदे मातरम् हा भारतीयांच्या संस्कृतीचा विषय आहे. याला जातीवादाशी जोडण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले. यात काही गैर आहे, असं मला वाटत नाही. आपण भारत माता की जय बोलतो, मग वंदे मातरम बोलायला काय हरकत आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com