Thackeray Vs Fadnavis : ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष संपणार ? 'जानी दुश्मन' पुन्हा 'जिगरी दोस्त' बनणार ?

Political News : फडणवीस आणि ठाकरेंमध्ये मनोमिलन होणार ?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Sarkarnama

Maharashtra Politics : विधानसभेच्या २०१९ निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीसह नवीन घरोबा करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात आरोप - प्रत्यारोपांमुळे विस्तव देखील जात नव्हता. शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकारचं कोसळणं, आणि एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ही ठाकरे फडणवीस दरी आणखीच वाढली. मात्र, आता फडणवीस- ठाकरे नात्यातील कटुता संपवत एकत्र येण्याचे संकेत आहेत.

युवासेनेचे प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत असं मत व्यक्त केलं होतं. तर फडणवीसांनीही याला दुजोरा दिला आहे. यानंतर फडणवीस आणि ठाकरेंमध्ये मनोमिलन होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केली होती.

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
NCP : अनिल देशमुखांच्या स्वागताला गर्दी करणाऱ्यांची कार्यकारिणीच्या बैठकीला मात्र दांडी !

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

आदित्य ठाकरें(Aaditya Thackeray) च्या विधानावर फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. आमच्यामध्ये फक्त वैचारिक मतभेद आहे. ते वेगळ्या विचारासोबत गेले आणि मी वेगळ्या विचाराचा आहे असं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तसेच महाराष्ट्रातील संस्कृतीनुसार आम्ही फक्त वैचारिक विरोधक आहोत. अलीकडच्या काळामध्ये आमच्यामध्ये थोडे शत्रुत्व पाहण्यास मिळत आहे, पण ते योग्य नसून कधीतरी आपल्याला ते संपवावे लागेल. आम्ही वैचारिक विरोधक असलो तरीही आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही असंही फडणवीस म्हणाले.

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Nashik News; केंद्रीय मंत्री थकले, आता दादा भुसे घालणार केंद्र सरकारला साकडे!

...आणि ठाकरे-फडणवीसांमध्ये पडली वादाची ठिणगी

उध्दव ठाकरेंनी २०१९ साली भाजपसोबत काडीमोड घेताना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुढे भाजपसोबत काडीमोड घेतला होता. यावरुन अमित शाह यांच्यासोबत मातोश्रीवर बंद दरवाजाआड घडलेल्या चर्चेचा संदर्भ दिला जात होता. तर अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंचा आरोप धुडकावून लावला होता.

महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर फडणवीस - ठाकरेंमधील शत्रुत्व वाढतच गेली. पाठीत खंजीर खुपसल्यापर्यंतची भाषा वापरण्यात आली. आणि फडणवीसांच्या साथीने शिंदेंनी सत्ता स्थापन केल्यानंतर तर त्यांच्यातला वाद आणखी विकोपाला गेला. पण आता पुन्हा एकदा फडणवीस ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com