Uddhav Thackeray News: ठाकरेंची शिवसेना जम्मूत विधानसभेच्या निवडणुका लढवणार! संजय राऊतांची मोठी घोषणा

Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) News : राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे...
Uddhav thackeray
Uddhav thackeraySarkarnama

Sanjay Raut Latest News: भाजपकडून आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. याचवेळी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेद्वारे देशात भाजप विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, याचदरम्यान उध्दव ठाकरेंची शिवसेना जम्मू विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Uddhav thackeray
Shivsena News; `भाजप`ला लायक उमेदवारही मिळत नाही

खासदार संजय राऊत हे जम्मूत दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ते सहभागी होणार आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. यात्रा जरी गांधी यांच्या नेतृत्वात असली तरी सर्वत्र काल संध्याकाळनंतर हजारो मशाली पेटलेल्या दिसल्या. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते.

मशाल हे काय काँग्रेसचं चिन्हं नाही, ते शिवसेनेचं आहे. मलाही भरून आलं. पण देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशाल घ्यावीच लागते. पाऊस असला तरी आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहोत असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

तसेच काँग्रेसशिवाय कोणत्याही विरोधी पक्षाची आघाडी होऊ शकत नाही. एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत असे कौतुकोद्गार देखील संजय राऊत यांनी राहुल गांधींविषयी काढले. याचवेळी शिवसेना जम्मू विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे असल्याची घोषणाही राऊत यांनी केली.

Uddhav thackeray
BrijBhushan Singh News : लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंहांबाबत क्रीडामंत्री आज घेणार मोठा निर्णय

...तर पीओके बद्दल तुम्ही का बोलतात?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काश्मीरी पंडितांच्या आंदोलनावरुन मोदी सरकारवर टीका केली. राऊत म्हणाले, जे मोदी सरकार सत्तेत आलं आहे,त्यांचा २०१४ मधील निवडणुकांच्या प्रचारातील सर्वात मोठा मुद्दा काश्मीरचाच होता. त्यावरच लोकांनी मत दिलं. तेव्हा जे सांगितलं होतं की, आम्ही पीओके घेऊन येऊ.

पण ते नंतर बघा, अगोदर इथे जे काश्मिरी पंडित बसलेले आहेत, त्यांचा जीव वाचवा. त्यांची जी छोटीशी मागणी आहे की, जम्मूमध्येच त्यांना ठेवा आणि रोजगार उपलब्ध करा. त्यांच्या मुलाबाळांना सुरक्षित ठेवा. ही छोटीशी मागणी काश्मिरी पंडितांची तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत, तर पीओके बद्दल तुम्ही का बोलतात असा सवालही राऊत यांनी यावेळी मोदी सरकारला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com