
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर आज एका कार्यक्रमात एकाच मंचावर आले होते. यावेळी ठाकरे यांनी भाषण करताना केंद्रातल्या भाजप सरकारवर तूफान हल्ला चढवला. देशामध्ये जातीपातीच्या भिंती उभ्या करून राज्य केले जात आहे, इंग्रजांची निती चालू आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
आज देशात सत्तेवर असलेली माणसं सत्ताधारी म्हणून नालायक आहेत. केंद्र आणि राज्यात ताळमेळ नाही. सगळी सत्ता आमच्या बुडाखाली हवी, असे सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. सरकारमधले कायदामंत्रीच न्यायाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आज आपण हुकूमशाहीतडे चाललो आहोत. लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांना गुलाम बनवण्याचे काम सुरू आहे. आज लोकशाही टिकणार की नाही, अशी परिस्थिती आहे, असे ठाकरे म्हणाले.
आज लोकशाही टिकवण्याचा काम आपल्याला करावं लागेल, असं त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशून म्हंटले. लोकशाही टिकवण्याचं काम आपण केलं नाही तर, आपल्याला आपल्या आजोबांचा नाव घेण्याचा अधिकार नाही, असे ठाकरेंनी आंबेडकरांना उद्देशून म्हंटले.
प्रकाश आंबेडकर म्हणजे माहिती आणि ज्ञानाचा धबधबा आहे. आज आम्ही एका व्यासपीठावर आलो असलो तरी, आमची वैचारीक व्यासपीठ एकच आहे. आज कुटुंब पूर्ण झालं, असे ठाकरे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.