"मला खेळ खेळायचा नाही" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

Uddhav Thackeray | Shivsena | Eknath Shinde : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची घोषणा
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज ऑनलाईन येवून राजीनाम्याची घोषणा केली. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी भावनिक संवाद साधला. ते म्हणाले, लोकशाहीचा डोकी मोजायचा खेळ मला खेळायचा नाही. शिवसेना प्रमुखाच्या मुलाला शिवसैनिकांनीच मुख्यमंत्री पदावरुन उतरवले. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत नाही. मी आज मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचाही त्याग करत आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने शेवटपर्यंत जनतेच्या भल्याचे निर्णय घेतला. सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या निधीपासून सुरुवात केली. शिवाय एवढे वर्षे आम्ही बोलत होतो, पण आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्त केली. नामांतरावरून मला आनंद वाटला. औरंगाबादला स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे नाव ठेवलं ते नाव आपण संभाजीनगरला दिलं आहे.

या नामांतराच्या प्रस्तावावेळी आज पर्यंत ज्यांचा विरोध होता त्यांनी साथ दिली. ज्यांची साथ अपेक्षित होती, त्यांनीच साथ सोडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवेसनेचे ४ मंत्री उपस्थित होते. ज्यांना मोठं केलं ते आज विसरले. शिवसेना काय आहे, ते अनुभवत आलोय. या काळात कोण रिक्षावाले, टपरीवाले, यांना नगरसेवक, आमदार, खासदार केले. माणसं मोठी झाली. पण ज्यांनी आपल्याला मोठे केले, त्यांनाच ते विसरली. या सर्वांना जे काही देता येईल ते दिले. पण तेच नाराज आहेत, ज्यांना नाही दिलं ते खूष आहेत. साधी साधी माणसं आम्हाला प्रोत्साहन देत राहिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी पण सांगितलं की तुम्ही नाराज होवू नका आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो.

पुढची वाटचाल सगळ्यांच्या आशिर्वादाने सुरू राहील. एखादी गोष्ट चांगली सुरू असली की त्याला दृष्ट लागते. आता कोणाची लागली हे तुम्ही जाणताच. कोर्टाने निर्णय दिला आहे, आता न्यायालयाचा मान राखला पाहिजे. उद्या बहुमताला सामोरं जावं लागणार आहे, लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे. लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार मानतो. पण त्यांनी त्याच वेगाने १२ आमदारांची यादी मंजूर केली असती तर आम्हाला बरं वाटलं असंत.

सुरक्षेवरुन केंद्राला टोला :

केंद्राच्या सूचनेवरून मुंबईत सुरक्षा वाढवली जात आहे. उद्या चीन सीमेवरील सुद्धा सुरक्षा मुंबई येईल याची लाज वाटते. एवढी लाज सोडली. पण उद्या लोकशाही जन्माला येतीय. त्याचा पाळणा हलतोय. त्यामुळे मी शिवसैनिकांना सांगतो की, उद्या येणाऱ्या शिवसैनिकांना कुणीही आडवं येवू नये. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. उद्या शिवसेनाप्रमुखाच्या पोराला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांना लाभणार आहे. मला पद जाण्यातची खंत अजिबात नाही, बहुमतामध्ये मला रस नाही. मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com