राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवा ; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

uddhav thackeray | हिंदुमध्ये फूट पाडण्याची नीच काम त्यांनी केले आहे," अशी जहरी टीका ठाकरेंना यावेळी केली.
Uddhav Thakare
Uddhav Thakaresarkarnama

मुंबई :"मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. कोश्यारींच्या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. (uddhav thackeray news update)

"राजपाल हे मानाचं पद आहे. राजपालपदाचा मी अपमान करु इच्छित नाही. कोश्यारींनी राज्यपालांच्या खुर्चीचा मान ठेवलेला नाही. महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात,"असा सवाल उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते.

"महाराष्ट्राला गड-किल्ले, खाद्य पदार्थ, पैठणी अशी विविध संस्कृती आहे. राज्यपालांनी या सगळ्याचा अनुभव घेतला आहे. त्यांनी कोल्हापुरी जोडा पाहिलेला नाही. राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखविण्याची गरज आहे," असा हल्लाबोल ठाकरेंना आज केला.

Uddhav Thakare
Arjun Khotkar : ठाकरेंच्या परवानगीनेच खोतकर शिंदे गटात ; राऊतांशी केली चर्चा

ठाकरे म्हणाले, "कोरोना काळात राज्यपालांना धर्मस्थळ उघडण्याची घाई झाली होती.त्यांच्या पत्राला मी उत्तर दिले नाही. तेव्हा मी मुख्यमंत्री असल्यामुळे फार बोललो नाही. पण गेल्या तीन वर्षात त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यांनी महाराष्ट्रात राहूनच महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ते सातत्याने वादग्रस्त विधान करीत आहेत,"

"राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे परप्रातींयामध्येही नाराजी आहे. मराठी माणसं सध्या चिडलेली आहे. अशा परिस्थितीत कोश्यारी असे विधान करीत आहेत. त्यांना मुंबई आंदण दिलेली नाही. त्यांचं स्क्रिट दिल्लीतून येते, त्यांना हे विधान करुन मराठी माणसामध्ये आग लावली आहे. मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यांच्या अशा विधानामुळे त्यांना घरी पाठवायचे की तरुंगात पाठवावे हे ठरविण्याची वेळ आली आहे. हिंदुमध्ये फूट पाडण्याची नीच काम त्यांनी केले आहे," अशी जहरी टीका ठाकरेंना यावेळी केली.

"त्यांनी महात्मा फुले यांचाही अपमान केला होता. आज तो ज्यांनी कहर केला आहे. हे विधान अनावधानाने आलेले विधान नाही. मागच्या काही दिवसांपासून सगळे वरती आले आहे. त्यांची भाषण कोण लिहुन देत माहित नाही. त्यांची भाषण कोण लिहून देत माहित नाही. त्यांच्या ओठावरचे वक्तव्य हे कुणाच्या पोटातून आले हे माहिती नाही,"असे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com