सदावर्तेंसारखी लोकं गरिबांना लुटून स्वत:ची घरं भरतात : अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. तर दुसरीकडे सदावर्ते यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.
Anil Parab on Gunratan Sadavarte, Anil Parab News Updates
Anil Parab on Gunratan Sadavarte, Anil Parab News UpdatesSarkarnama

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांना अटक झाल्यानंतर कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. तर दुसरीकडे सदावर्ते यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी पोलिसांनी हे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. त्यावरून परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी बुधवारी सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला. (Anil Parab on Gunratan Sadavarte)

वकील सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अशिक्षित आणि भावनिकतेचा फायदा घेतल्याचे सांगत परब म्हणाले, सदावर्ते यांच्यासारखी लोकं गरीब लोकांना लुटून स्वतःची घरं भरतात. पण आज सगळं काही उघड झालं आहे. गेल्या पाच महिन्यात एसटी महामंडळाचं (MSRTC) मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये कर्मचारीही भरडले गेले आहेत. एसटीचं विलनिकरण करूनच देऊ, असं कर्मचाऱ्यांना बोलून सदावर्ते भडकवण्याचं काम करत होते.

Anil Parab on Gunratan Sadavarte, Anil Parab News Updates
सदावर्तेंचा मुक्काम तुरूंगात अन् कर्मचाऱ्यांची 'एसटी'ला साथ

आम्ही पगारवाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे होतं. पण कर्मचारी आमचेच आहेत. आज अनेक कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारचं आंदोलन होणार नाही, याची काळजी परिवहन विभाग घेईल, असंही परब म्हणाले, दरम्यान, आंदोलकांनी आता परतीची वाट धरली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली. सध्या जवळपास 80 टक्के गाड्या मार्गावर आहेत. एकूण 9700 बस मार्गावर धावत असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र नोकरीवर पाणी सोडावे लागू शकते, असा इशारा परब यांनी दिला आहे. सदावर्ते यांच्या अटकेनंतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला नेतृत्वच नसल्याने कर्मचारी कामावर रुजू होऊ लागले आहेत. मंगळवार (ता. 19) पर्यंत 82 हजार 108 पैकी 69 हजार 82 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

आता केवळ 13 हजार कर्मचारी कामावर रुजू व्हायचे आहेत. त्यांना आणखी दोन दिवसांची मुदत असल्याने तेही रुजू होऊ शकते. कर्मचारी रुजू होत असल्याने सध्या 80 ट्क्कयांहून अधिक बस मार्गावर धावत आहेत. एकूण 12 हजार 861 पैकी 9 हजार 768 बस मार्गावर आल्या आहेत. तर फेऱ्यांची संख्या 27 हजार 700 हून अधिक आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना दिलासा मिळत आहे.

Anil Parab on Gunratan Sadavarte, Anil Parab News Updates
राऊत, खडसे समाज विघातक; असा झाला फोन टॅपिंगचा प्लॅन

एसटीची सद्यस्थिती (19 एप्रिल)

विभाग हजेरी पटावरील कर्मचारी हजर

प्रशासकीय 12006 11701

कार्यशाळा 15791 13921

चालक 29485 23923

वाहक 24826 19537

एकूण 82108 69082

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com