मुंबई : भाजपसोबत जाण्यासाठी शिवसेना तयार आहे, हे संजय राऊत अगदी स्पष्टपणे बोलले आहेत. आता यापुढचा निर्णय पक्ष प्रमुख ठरवतील. पण, त्या आमदारांनी स्वतः मुंबई येण्याची हिंमत दाखवली पाहिजे, असे स्पष्ट मत शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
भाजपसोबत जायला सेना तयार पण आमदारांनी मुंबईत येऊन पक्ष प्रमुखांसमोर अशी मागणी केली पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, भाजपसोबत जायला सेना तयार आहे, हे श्री. राऊत स्पष्टपणे बोलले आहेत. पुढचा निर्णय पक्ष प्रमुख ठरवतील. पण आमदारांनी स्वतः आले पाहिजे. मुंबईत येण्याची त्यांनी हिंमत दाखवली पाहिजे.
शिवसेनेच्या वतीने बंडखोर आमदारांना आधी संपर्काचे आव्हान होते, आता सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, याविषयी त्यांनी मला याबाबत अधिक बोलता येणार नाही, पक्ष प्रमुखच निर्णय घेतील, असे सांगितले. आकडेवारीचे गणित कसे जुळणार, याविषयी विचारले असता निलम गोऱ्हे म्हणाले, अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, पण त्यांच्या यादीत अपक्षांची नावे दिली आहेत.
आमचे स्पष्ट मत आहे की शिवसेनेच्या आमदारांनी येथे येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे. आता शिवसेनेच्या त्या आमदारांनी पुनर्रविचार करावा. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला साथ द्यावी. एकनाथ शिंदेंची तर भाजपसोबत जावा, अशी मागणी आहे, या प्रश्नावर निलम गोऱ्हे यांनी याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.