हे तर अजितदादांच्या विरोधातील षडयंत्रच...देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

षडयंत्र करणारे राष्ट्रवादीतील NCP कोण नेते आहेत, असे विचारले असता, श्री. फडणवीस devendra fadanvis म्हणाले, सगळे मीच सांगितले तर पत्रकारांना काय काम. मी माझा कयास व्यक्त केला आहे.
Devendra Fadanvis, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Ajit Pawarsarkarnama

मुंबई : देहूतील कार्यक्रमात अजितदादांचे नाव भाषणाच्या यादीत नाही, हे लक्षात आल्यावर अजितजी आप नहीं बोलेंगे, असे पंतप्रधानांनी विचारले होते. पण, काहीजण चांगल्या झालेल्या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित हे अजित दादांच्या विरोधातील षडयंत्र आहे, असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

श्री. फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी देहू येथील कार्यक्रमात अजितदादांना बोलून दिले नाही. त्यावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली असून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा निषेध केला आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar
मलिकांसह जैन यांचं मंत्रिपदही जाणार? भाजप नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

याविषयी स्पष्टीकरण देताना श्री. फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांनी अजित दादांची विचारपूस केली. ऐवढेच नव्हे तर भाषणाच्या यादीत अजितदादांचे नाव नाही, हे लक्षात आल्यावर अजितजी आप नहीं बोलेंगे, असे पंतप्रधानांनी विचारले होते. त्यावर अजित पवारांनी त्यांना आपणच बोला, असे सांगितले होते. देहूचा कार्यक्रम चांगला झाल्यानंतर काहीजणांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारे गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar
राज्यसभेतील भूकंप...विधान परिषदेतही करणार.. चंद्रकांत पाटील

मला वाटते कदाचित हे अजितदादांच्या विरोधातील षडयंत्र आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसेच षडयंत्र करणारे राष्ट्रवादीतील कोण नेते आहेत, असे विचारले असता, श्री. फडणवीस म्हणाले, सगळे मीच सांगितले तर पत्रकारांना काय काम. मी माझा कयास व्यक्त केला आहे. राजकारणात प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत असते. मला वाटते ते मी सांगितले, कोणामुळे होतंय हे शोधून काढणे हे पत्रकारांचे काम आहे, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

Devendra Fadanvis, Ajit Pawar
देहूतील कार्यक्रमवार अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, पण फक्त ६ वाक्यातच!

अग्निपथचा विरोध मावळेल...

अग्निपथला काही राज्यातून विरोध होत आहे, याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणले, ज्या लोकांनी विरोध केला तो गैरसमजातून केला आहे. अग्निपथ ही अतिरिक्त योजना आहे. चार वर्षापर्यंत सैनिकीशिक्षण घेता येणार आहे. २१ वर्षा वयाच्या आतील युवकांना ही संधी मिळणार आहे. पुढे सैन्यात जाण्यासाठी तयार असलेल्यांना सैन्यात देखील जाण्याची संधी मिळणार आहे. आपल्या मुलांत सैनिकी बाणा तयार व्हावा, यासाठी ही योजना आहे. आता तिचे स्वागत होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com