Maharashtra Politics : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आमदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. अशातच या नाराजीवर बच्चू कडूंनी भाष्य केलं.मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. पण बंडखोरी होण्याइतकी नाही, असं माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. (There is displeasure with the expansion of the cabinet..; Finally Bachu Kadu agreed)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती. पण गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
“मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने नाराजी नाही. पण 2024 नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने सरकारमध्ये अस्वस्थता आहे. पण, बंडखोरी होईल, इतकी अस्वस्थता नाही. आम्हीही कधी नाराज होतो पण कालांतराने नाराजू दूर होते. आता पुढचे सात ते आठ महिनेच आमच्या सरकारचा कार्यकाळ उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची सरकारची मानसिकता नाही. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा जैसे थे स्थितीत सरकार चालवणं योग्य राहिल.असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
एका जिल्ह्याला एक पालकमंत्री असेल तर त्या जिल्ह्याचे प्रश्न लवकर सुटतात. पण एकाच व्यक्तीकडे आठ-नऊ जिल्हे असतील तर लोकांच्या अडचणी वाढतात,” असे बच्चू कडू म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.