आमच्या कुटूंबियांची जबाबदारी तुमच्यावर; शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Eknath Shinde| राज्याच्या गृहविभागाने एकनाथ शिंदेंसह इतर बंडखोर आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेत मोठी कारवाई केली आहे.
Eknath Shinde news update|
Eknath Shinde news update|

मुंबई : शिवसेना आमदरांच्या बंडखोरीचा आज पाचवा दिवस आहे. या पाच दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बंडखोर आमदारांना परत बोलावण्याचे अनेक प्रयत्न करुनही आमदार येण्याची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीयेत. असे असताना आता राज्याच्या गृहविभागाने एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) इतर बंडखोर आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेत मोठी कारवाई केली आहे.

आमदारांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनेकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याच्या घटना समोर येत आहेत. असे त्यातच आता गृहविभागाने या सर्व आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेतली आहे. या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे हे पत्र शेअरही केले आहे.

Eknath Shinde news update|
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये आता राष्ट्रवादीची एन्ट्री ; सेनेच्या आमदारांवर नजर, चर्चांना उधाण

''राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे लिहीत त्यांनी शिवसेनेला एक प्रकारे इशाराच दिला आहे. तर दूसऱ्या ट्विट मध्ये, 'गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे,' अशी खंतही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेले पत्र लिहीले आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेतील एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची सुरक्षाव्यवस्था काढण्यात आल्याची तक्रार शिंदेंनी केली आहे. तसेच, आमदारांच्या कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न होतोय.आमदारांच्या कुटूंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या कुटूंबियांना काही झालं तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,पर्यावरण आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत जबाबदार असतील असे म्हटले आहे. या पत्रावर शिवसेनेच्या 38 आमदारांच्या सह्यादेखील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com