Maharashtra Budget 2023: 'त्यांची' तोंडे पाहण्यासारखी झाली होती; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Devendra Fadnavis: पाच ध्येयांच्या आधारावर महाराष्ट्राचा विकास करणार
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असल्याने त्यास पंचामृत अर्थसंकल्प संबोधण्यात आले. यात राज्यातील प्रत्येक घटकाला लाभ होईल, अशा योजनांचा समावेश अर्थमंत्र्यांनी केला आहे.

ग्रामीण भागासह शहरातील नारिकांनाही अर्थसंकल्पातून लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिलांसह समाजातील वंचित घटकाला समावून घेतले आहे. यासह मराठी भाषा, मराठी संस्कृतीसाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त शब्दांचा फुलोरा आणि योजनांचा पाऊस असल्याची टीका विरोधकांनी केली. या अर्थसंकल्पातून फक्त गाजर दाखविले आहे, असाही टोला विरोधकांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, "यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अर्थसंकल्पामधून दिलासा दिला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे."

Eknath Shinde
Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात संत तुकारामांच्या ओव्या अन् महाराष्ट्राला पंचामृताचा प्रसाद !

या अर्थसंकल्पात समजातील सर्व घटकांना मदत मिळणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूदी केलेल्या आहेत. ते ऐकूनच विरोधकांना काय बोलावे हेच समजेना झाल्याचा टोला शिंदेंनी लगावला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "हा अर्थसंकल्प इतका सर्वसमावेशक आहे की विरोधकांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. त्यांना काय बोलावं हेच आता कळत नाही. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे."

Eknath Shinde
Maharashtra Budget : अर्थसंकल्पात घोषणांचा महापूर; 'पंचामृता'च्या माध्यमातून फडणवीसांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग!

फडणवीसांनी अर्थसंकल्पातून पाच ध्येयांच्या आधारावर राज्याचा विकास करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे पंचामृत असल्याचे ते म्हणाले. या पंचामृतात खालील ध्येय ठरविण्यात आली आहेत.

- शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी

- महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास

- भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास

- सक्षम रोजगार

- पर्यावरणपूरक विकास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com