मोठी बातमी : आव्हाडांनी नाव घेतलेल्या डीसीपी राठोडांची तडकाफडकी बदली

त्या दबावातून डीसीपी राठोड यांनी आपल्याला अटक केली, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले हेाते.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करणारे ठाण्याचे (Thane) डीसीपी विनय राठोड (Vinay Rathod) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आपल्याला अटक करताना पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्या दबावातून डीसीपी राठोड यांनी आपल्याला अटक केली, असे म्हटले हेाते. त्यानंतर राठोड यांची अचानक परिमंडल पाचमधून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. (Thane DCP Vinay Rathod has been transferred immediately)

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी शुक्रवारी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी अटकेचा संपूर्ण वृत्तांत त्यांनी ट्विटवर मांडला होता. तसेच, आज जामीन मिळाल्यानंतर माझ्या अटकेमागे ‘चाणक्य’चा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र, ‘चाणक्य’ची नीती फसली, असेही त्यांनी म्हटले हेाते.

Jitendra Awhad
जामीन मिळताच आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया : ‘चाणक्य’ची नीती फसली...

जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले हेाते की, दर तीन मिनिटांनी डीसीपी उठायचे आणि एस... एस... सर म्हणत बाहेर जायचे आणि परत यायचे, त्यामुळे पोलिसांचा माझ्या अटकेमध्ये कोठेही दोष आहे, असे मी म्हणणार नाही, असे म्हटले होते. दरम्यान, काल ट्विटमध्ये आव्हाड यांनी ठाण्याचे डीसीपी विनय राठोड यांचे नाव घेतले होते. त्यामुळे राठोड यांची बदली एवढ्या तडकाफडकी पद्धतीने कशी झाली, याची चर्चा सुरू झाली आहे. राठोड यांना परिमंडल पाचमधून ठाण्याच्या वाहतूक शाखेत टाकण्यात आले आहे.

Jitendra Awhad
अमोल किर्तीकरांनी थोपटले वडिलांविरोधात दंड; शिवसेनेच्या बैठकीला हजेरी लावत केला 'हा' निर्धार!

ट्विटमध्ये आव्हाड यांनी काय म्हटले होते?

शुक्रवारी दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी त्यावेळी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलिस स्टेशनला येतो आणि नंतर मुंबईला जातो.

Jitendra Awhad
'अशा लोकांमुळे आम्हाला पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल' : उमेश पाटलांचा राजन पाटलांवर हल्लाबोल

मी पोलिस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलिस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com