ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत लबाड....

राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना या फसवणुकीचा फटका बसला असताना ठाकरे सरकार मात्र, पाहणी दौऱ्याच्या नावाखाली आलिशान गाड्यातून पर्यटन करण्यात दंग आहे.
Thackeray government is the most deceitful government in the history of Maharashtra ....
Thackeray government is the most deceitful government in the history of Maharashtra ....

फलटण शहर : राज्यातील जनता व शेतकरी वादळ, अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत असताना मदतीचा हात पुढे करण्याऐवजी ठाकरे सरकारने स्वतःच्या खोट्या जाहिरातबाजीवर १६० कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे. शेतकऱ्यांना उद्धवस्त करणाऱ्या ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार अशीच होईल, अशी टीका माढाचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा भीमदेवी थाटात राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली. त्यास दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोट्या जाहिरातींवर १६० कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी १५० कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यांस मोठा दिलासा मिळाला असता. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यास कर्जमुक्त करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र, वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यांस वेठीस धरले जात आहे. पीकविम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असा आरोपही खासदार निंबाळकर यांनी केला आहे.

राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना या फसवणुकीचा फटका बसला असताना ठाकरे सरकार मात्र, पाहणी दौऱ्याच्या नावाखाली आलिशान गाड्यातून पर्यटन करण्यात दंग आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती.

त्यावर कोणतीच कार्यवाही तर नाहीच, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टीसारख्या संकटामुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होईल, अशी टीकाही खासदार निंबाळकर यांनी केली आहे. 

खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र रसातळाला चालला असताना कोविडचे कारण सांगत जनतेस घरात डांबून ठेऊन स्वतःची कातडी वाचविण्याचे सरकारचे कारस्थान आता उघड झाले आहे. 

- रणजितसिंह नाईक- निंबाळकर, खासदार 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com