
Mumbai News: विदर्भातील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मंत्रालयात आंदोलन करत मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या मारत केलेल्या आंदोलनाप्रकरणी आता १५ दिवसानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या आंदोलनाप्रकरणी राज्य सरकारने आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.
अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले होते. या शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून आंदोलन केले होते. मात्र, पोलिसांनी या शेतकऱ्यांना तातडीने ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला होता. त्यानंतर या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घेतली होती. आता याच प्रकरणी राज्य सरकारने दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
विदर्भातील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाची माहिती अमरावती पोलिसांकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यामधील एक पोलीस कर्मचारी हा वरिष्ठांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात 'मॅट'मध्ये गेल्याची देखील चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते, ते पाहणे महत्वाचे असणार आहे.
Edited by - Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.