मुंबई : ‘‘शरद पवारांचे विधान निरर्थक नसते, पवार म्हणाले की, मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्वास आहे. तुम्ही सीआयए, केजीबी, मोसादकडून तपास करावा, त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिले नाही,’’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. त्यावर राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, शरद पवार यांनी भूमिका घेतल्यास त्यावर प्रसारमाध्यमांनी चिंता करायची गरज नाही. या प्रकरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव कुठेही येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या कुटुंबातील नाव घेऊन सनसनाटी निर्माण केली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
पार्थ पवारांबद्दल ‘नो कमेंट’
राऊत म्हणाले, पार्थ पवार यांच्या भूमिकेवर मी काय बोलणार? त्यावर त्यांचे सर्वोच्च नेते बोलले आहेत, असे सांगत पार्थ पवार यांच्या प्रकरणावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.
सरकार मजबूत
हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. १७० आमदार पाठीशी आहेत, यापेक्षा आमदारांची सध्या गरज नाही असे म्हणत सरकार मजबूत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
भाजपकडून यावर प्रतिक्रिया आली असून सुशांतसिंह मृत्यू प्रकरण सीबीआयकडे देणे आवश्यक आहे, असाच शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. त्यांच्या सरकारने आणि गृह मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात हीच भूमिका घ्यावी, अशी आमची अपेक्षा आहे, असे माजी मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.