
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातो.
याच दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. आमच्यातील एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईन, असे मी याआधीच सांगितले आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटल आहे.कोण जिंकणार कोण हरणार होणार हे ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल करत उमेदवार हरणारे की जिंकणार हे सगळं मतदार ठरवत असतात, अशी खोचक टीकादेखील शिंदे यांनी केली.
सामान्यांना न्याय देणारी भूमिका आम्ही घेतली आहे. सर्वसामान्यांना आमची भूमिका पटणारी आहे. मला आठवतय मी दिल्लीतुन पुण्याला गेलो. नंतर पंढरपूरला निघालो असताना पुण्यात रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक स्वागतासाठी उभे होते. पंढरपुरातही दहा लाखांपेक्षा जास्त गर्दी होती. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मला गाडीबाहेर उतरण्यास मनाई केली. पण तरीही मी गाडीच्या बाहेर आलो. सर्वांना अभिवादन केलं, हे वारकरी हेच माझे रक्षक असल्याचं मी पोलिसांनी सांगितले. मारणाऱ्यांपेक्षा वाचवणारा मोठा असतो,” असे म्हणत राज्यातील शिंदे-भाजपाच्या सरकारला लोकांचा पाठिंबा आहे, असा दावा शिंदे यांनी केला
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.