शिवसेना आमचं 'रक्त' आहे : दीपक केसरकरांनी सांगितली दोन उदाहरण

Deepak Kesarkar | Shivsena : "आमची लढाई कॉग्रेस , राष्ट्रवादीविरोधात आहे. शिवसैनिकांची बदनामी करु नका.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsarkarnama

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) गट आणि शिवसेना (shiv sena) यांच्यातील संघर्ष सातत्याने वाढत आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल (गुरुवारी) बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना आमचं 'रक्त' आहे, असे सांगत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. यासाठी केसरकर यांनी दोन उदाहरण देखील सांगितली. (Deepak kesarkar latest news)

"उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी गद्दारी केली," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी काल केला होता. तसेच "लाज असेल राजीनामा देवून पुन्हा निवडून येवून दाखवा" असे आव्हानही दिले होते.

त्या आरोपांना आणि आव्हानांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरे आजारी असताना आम्ही बंड केलेले नाही. तसेच आदित्य ठाकरेंचे आव्हानही पोकळ आहे. आम्हाला निवडून येण्याच्या धमक्या देतात, पण अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आमच्या प्रादेशिक अस्मितेला डिवचू नका आणि आमचा अपमान करु नका, जनता पेटून उठेल. आदित्य ठाकरे तरुण नेते आहेत, पण कसे बोलायचे याचा त्यांनी उद्धव ठाकरेंकडून आदर्श घ्यावा. त्यांच्याबाबत अजूनही आदर आहे, आम्ही आदराने बोलतो, त्यांनीही आदराने बोलावे. आम्हाला डिवचलं तर महागात पडेल," असा इशारा केसरकरांनी यावेळी ठाकरेंना दिला.

"शिवसैनिकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत, म्हणून शिवसेनेचे काही नेते आज सोबत आहेत. दादा भुसे, संदीपान भुमरे, संजय राठोड माझ्यासोबत आहे. ज्यांनी शिवसेना उभी केली ते नेते माझ्यासोबत आज पत्रकार परिषदेत आहेत. शिवसेना म्हणजे आमचं रक्त आहे. संजय राठोड यांचं लग्न ठरलं तेव्हा शिवसेनेसाठी तुरुंगात होते. त्यावेळी त्यांचे सासरे म्हणाले, तुम्ही आले नाही तर फोटोशी लग्न लावू. भुमरे ५ टर्म आमदार झाले. कितीतरी वेळ जेलमध्ये गेले असतील. इतकी शिवसेनेप्रति सगळ्यांची कमिटमेंट आहे.

२/३ आमदार असून आम्ही आमदारकी वाचवू शकलो असतो. आम्ही दुसऱ्या पक्षातही विलीन होऊ शकलो असतो. पण शिवसेना म्हणजे आमचं रक्त आहे. आम्ही आमदारकी पणाला लावली आणि शिवसेनेत थांबलो. याला शिवसेना म्हणतात. त्यामुळे तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी आहे.

"आमची लढाई कॉग्रेस, राष्ट्रवादीविरोधात आहे. शिवसैनिकांची बदनामी करु नका. जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना वेगळ स्थान असतं. शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील. त्यांच्या यात्रा आताच का निघत आहेत, ते इतकी वर्ष महाराष्ट्रात का फिरले नाहीत," असा सवाल देखील केसरकरांनी उपस्थित केला.

केसरकर म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून शिवसेना ५ वर्ष सतेत राहू शकते. हिंदुत्वांच्या विचाराशी ठाम राहिलं पाहिजे, दिशाभूल करुन चालत नाही. उद्धव ठाकरे साहेब बरे झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती, राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ सोडा, असे त्यांनी ठाकरेंना सांगितलं होतं, असाही खुलासा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com