Maharashtra News : महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनमध्ये, राज्यपाल कुठे आहेत?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन चौदा दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही.
Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, Maharashtra Political News
Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, Maharashtra Political NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन चौदा दिवस आले आहेत. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे आता शिंदे सरकारवर टीका होऊ लागली आहे. नवीन सरकारसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शपथविधीसाठी परवानगी दिली होती. पण अजूनही विस्तार झालेला नसल्याने राज्यात लॉकडाऊनसारखी स्थिती झाल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut Latest News)

संजय राऊत यांनी गुरूवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेला आहे. महापूरात जवळपास शंभर लोकं मृत्यूमुखी पडली आहेत. अनेक भागात कॉलराचं थैमान आहे. तिथेही लोकं मृत्यूमुखी पडत आहेत. दवाखान्यात गोंधळ आहे. अशा स्थितीत राज्यात सरकार नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं म्हणजे सरकार आलं असं होत नाही.(Maharashtra Political News)

Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, Maharashtra Political News
शिंदेंना 15 खासदार भेटले? राऊतांनी आकडा 'करेक्ट' केला...

बारा दिवस होऊन गेले मग सरकार का स्थापन होत नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी ठेवली आहे. यातील अनेक आमदार एका गटात गेले आहेत. ते अपात्र ठरू शकतात. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्यांना शपथ देणं हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजद्रोह आणि राजकीय भ्रष्टाचार आहे, अशी टीका राऊतांनी केली.

राज्यपालांनी अशाप्रकारचे कोणतेही घटनाबाह्य कृत्य करू नये, असं पत्र शिवसेनेकडून त्यांना गेलं आहे. घटनेचे पालन आतातरी करा. कालपर्यंत केले नाही. आता राज्यपाल कुठे आहेत. सरकार, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. राज्य वाऱ्यावर आहे. राज्यात महापूर आहे. राज्यपाल कुठे आहेत, असा सवाल राऊतांनी केला.

Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, Maharashtra Political News
राज ठाकरेंच्या मुलाला मंत्रिपद मिळणार? शिंदे गट-भाजप धक्का देण्याच्या तयारीत

जे कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते. आता त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. राज्यपालांनी विचारायला हवे. महाराष्ट्रात दोन वर्षापूर्वी महापूर आला होता तेव्हा राज्यपाल आढावा घ्यायला गेला होता. आता ते राजभवनात काय करत आहेत. राज्याची जनता त्यांची वाट पाहत आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com