Mumbai Cricket Association Election
Mumbai Cricket Association ElectionSarkarnama

Shiv Sena : शिंदेंचा रामदास आठवले होईल.. 'वानखेडे' वरील ‘स्नेह’ इतर वेळी कुठे अदृश्य होतो ?

Shiv Sena : बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार ?

Shiv Sena : मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा बड्या नेतेमंडळींचा अध्यक्षपदासाठी अमोल काळे यांना पाठिंबा होता. या निवडणुकीवरुन 'सामना'च्या 'रोखठोक'मधून भाष्य करण्यात आले आहे.

हे विधान बोलके आहे

‘मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘शिंदे यांचा रामदास आठवले होईल.” हे विधान बोलके आहे,’ असं टोला 'रोखठोक'मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

Mumbai Cricket Association Election
Eknath Shinde : बच्चू कडू-राणांमध्ये पॅचअप ?; CM शिंदे समेट घडविण्यात यशस्वी ठरणार का ?

शेतकरी अडचणीत आहे...

‘महाराष्ट्रातील दिवाळी शेतकऱयांसाठी बरी नाही. सर्वत्र महाप्रलय आहे आणि शेतकऱ्यांची खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाहून गेली. शेतकरी अडचणीत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होईल. पण आपले सर्वपक्षीय राजकारणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले व त्यांनी वानखेडे मैदानावर स्नेहभोजन केले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि शिवसेनेचे लोकही त्यात सामील झाले. हा ‘स्नेह’ इतर वेळी कुठे अदृश्य होतो?’असा रोखठोक प्रश्न 'सामना'मधून विचारण्यात आला आहे.

Mumbai Cricket Association Election
Bharat Jodo Yatra : 'रिस्पॉन्स' साठी 'परफॉर्मन्स' चांगला ठेवा ; राहुल गांधींची भाजपनं उडवली खिल्ली

'सामना'च्या रोखठोकमध्ये म्हटलं आहे की..

  1. मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व शिंदे गट करतो.

  2. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमासाठी शिवसेनेस तलावपाळी परिसर मिळू नये यासाठी पुन्हा हायकोर्टात जावे लागले.

  3. दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्क मैदानासाठी हा नियम पाळला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने या अशाच कार्यात गुंतवून ठेवले आहे,’

  4. महाराष्ट्राच्या विकासात शिंदे यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही.

  5. फडणवीस दिल्लीत गेले. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले.

  6. धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस व भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com