
विरार : निवडणूक राज्यसभेची (RajyaSabha) असली तरी सद्या या निवडणुकीचे केंद्र बिंदू हे वसई तालुका झाले आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी भोवती राजकारण फिरत आहे. शिवसेनेने (Shivsena) आपला दुसरा उमेदवार उभा केल्याने निवडणूक अटीतटीची झाली असल्याने एकेक मतांसाठी भाजप (BJP) आणि शिवसेना प्रयत्न करत आहे. बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्याकडे खेटे घालत आहेत. आज तर चक्क महाविकास आघाडीचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी हितेंद्र ठाकूर यांना फोन केल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीला शरदास्त्र तारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (RajyaSabha Election Latest News)
राज्यसभेच्या निवडणुकीत कधी नाही ती चुरस निर्माण झाली. अपक्षांच्या मतांना भाव आला आहे. त्यातहि ३ आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे शिवसेना आणि भाजपचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे बविआच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे. निवडणूक जाहीर झाल्या नंतर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी हितेंद्र ठाकूर यांनी भेट घेतल्या नंतर शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊत यांनी सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ठाकूर यांची भेट घेतली होती. तर मंगळवारी भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन यांनीही ठाकूर यांची भेट घेतली. तरीही त्यांनी आपले पत्ते ओपन केले नव्हते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. मात्र, या बैठकीला बविआला बोलावण्यात आले, नसल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना सांगितल्यावर आज वेगाने राजकीय चक्रे फिरली. आघाडीचे शिष्ट मंडळ ठाकूर यांना भेटायला आले होते. या शिष्ट मंडळात राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे माजी खासदार अशोक मोहोळ, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांचा हितेंद्र ठाकूर यांना फोन आल्याची माहिती मिळत आहे.
हितेंद्र ठाकूर हे शरद पवार यांचा शब्द खाली पडून देणार नाहीत. असे याठिकाणी बोलले जात आहे. या बैठकीनंतर ठाकूर यांनी पाटीम्ब्या बात कोणतेही वक्तव्य केले नसले, तरी राज्यसभेच्या निवडणुकीत शरदास्त्र महाविकास आघाडीला तारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पालघर जिल्हा असो किंवा वसई विरार महानगर पालिका निवडणूक असो प्रत्येक वेळी नगरविकास मंत्री आणि पालघरचे प्रभारी एकनाथ शिंदे हे सेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी विधान सभेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणूक प्रचारातून शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना दूर ठेवल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभेची निवडणूक असली तरी येणाऱ्या काळात वसई-विरार महापालिकेची निवडणूक होणार असून, त्या निवडणुकीची गणिते या वेळी ठरणार आहे. वसई-विरार महापालियेच्या स्थापने पासून पालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. याठिकाणी दोन्ही काँग्रेसला आपले खाते उघडता आले नव्हते. वसई तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद असली तरी त्याचे परिवर्तन पालिकेत दोन आकडी नगरसेवकांमध्ये होताना दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांना जवळ घेऊन पालिकेत आपली संख्या वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याची चिन्हे याठिकाणी दिसत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.