अशी विधानं करताना जरा डोकं ठिकाणावर ठेवा; संजय राऊतांचा मनसेवर पलटवार

Sanjay Raut| Raj Thackeray| राज ठाकरे यांनी काल एका पत्रकाद्वारे हनुमान चालिसाच्या भूमिकेवर ठाम असल्याची घोषणा केली.
Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई: आम्ही सर्व मंदीरांवर भोंगे लावतो, कधी कधी रात्रभर भजन किर्तने सुरु असतात, मग हे सर्व बंद कारायचं का आम्ही, अशा सवाल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच, जरा डोकं ठिकाणावर ठेवून वक्तव्य केलं तर महाराष्ट्रावर उपकार होतील. असा टोला त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल एका पत्रकाद्वारे हनुमान चालिसाच्या भूमिकेवर ठाम असल्याची घोषणा केली. यात, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले. '' कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी "सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात?.'' असे यात म्हटले आहे. या विधानावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

Sanjay Raut
Video: बाळासाहेबांचा 'तो' व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

सर्व भोंगे बंद करा असे बाळासाहेब कधीच बोलले नाही. महाराष्ट्रात सर्व धर्मीयांचे काहीना काही कार्यक्रम होत असतात. रामकथा, रात्रीचे गरभे, गणेशोत्सव असे सण सुरु असतात. हे हिंदूंचे सण आहेत, मग हे सुद्धा बंद करायचे आहेत का, तुम्हाला हिंदूत्त्वाचे धडे देणाऱ्या मास्ताराची डिग्री बोगस आहे, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाही टोला लगावला आहे,

त्यामुळे आपण शिवसेनेला हिंदूत्त्व शिकवू नये. हिंदूत्त्वासाठी उद्धव ठाकरेंना कोणाकडून सल्ले घेण्याचे गरज नाही. बाळासाहेबांचे दाखले देणाऱ्यांनी आधी बाळासाहेबांना नीट समजून घ्यावं, मुंबईतील काही मशिदींनी न्यायालयाच्या निर्णयानुसार, भोंग्याचा आवाजावर मर्यादा ठेवण्याचं मान्य केलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलं तर न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल. पण जर राज्यात न्यायालयाच्या निर्णयाचे पालन होणार नसेल तर समान नागरी कायद्याची भाषा तरी का करता, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. जर प्रत्येक नागरीकाची समान नागरी कायद्याची मागणी करत असेल तर प्रत्येकाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायलाच हवे .

मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो. इतर नागरीकही करतात, पण असे करताना कोणी फक्त राजकीय स्वार्थासाठी चिथावणीखोर भाषा करत असेल आणि आणि केंद्रातील पक्ष त्याला साथ देत असेल तर पंतप्रधानांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. कुणाच्याही अल्टिमेटमवर सरकार चालणार नाही, असेहीसंजय राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com