Sambhajinagar : 'औरंगाबादचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करू शकलो, याचा अभिमान' : ठाकरेंनी घेतले श्रेय !

Sambhajinagar : 'या पुर्वीच्या मुख्यमंत्र्यांना नामांतर करता आलं नाही,' ठाकरेंचा फडणवीसांना टोला..
Sambhajinagar :  Uddhav Thackeray
Sambhajinagar : Uddhav ThackeraySarkarnama

Sambhajinagar : मागील अनेक दिवसांपासून उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आज अखेर केंद्र सरकारने या निर्णयालाला मंजुरी दिली आहे. औरंगाबाद नामांतर 'छत्रपती संभाजीनगर', तर उस्मानाबादचं नाव 'धाराशिव' या नामांतराला केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतरचा आम्ही प्रस्ताव मंजूर केले होते, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांचा नावाचा जो प्रस्ताव होता, या प्रस्तावांना आज मंजुरी मिळालेली आहे. म्हणून सद्याच्या महाराष्ट्रात असलेल्या सरकारला एवढ्या पुरता धन्यवाद देतो की, इतर अनेक निर्णयांनी त्यांनी स्थगिती दिली होती, मात्र आम्ही जो नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय घेतला होता, त्याला स्थगिती दिली नाही. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो."

Sambhajinagar :  Uddhav Thackeray
Mangaldas Bandal News : तुरुंगातून सुटलेल्या बांदलांचे विरोधकांना थेट चॅलेंज : ‘राजकीय हिसाब तो जरूर पुरा करेंगे’

ठाकरे पुढे म्हणाले, "आजही मला तो क्षण आठवतोय, माझी शेवटची कॅबिनेट मिटिंग होती. ज्या क्षणाला हे दोन्ही प्रस्ताव आले, ते प्रस्ताव मांडल्याबरोबर पुढच्या क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षातील मंत्रिमंडळातील जे सदस्य होते, त्यांनी त्याच क्षणी यासाठी होकार दिला. कोणीही शंका कुशंका काढली नाही. जे नामांतर यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी करू म्हंटल होतं, पण त्यांना करता आलं नाही. मात्र ते आम्ही करू शकलो, याचा मला अभिमान आहे, असे ठाकरेंनी उपमुख्यमंत्रील देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेताच टोला लगावला.

Sambhajinagar :  Uddhav Thackeray
Sambhajinagar : मोठी बातमी : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राचा हिरवा कंदील !

दरम्यान, मागील महाविकास आघाडी सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराबाबत प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याबाबतचा प्रस्ताव ठाकरे सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. ठाकरे सरकार पायउतार होण्याआधी उद्धव ठाकरेंनी अखेरच्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाबाबतचा निर्णय घेतला होता.

मात्र ठाकरे सरकार पायऊतार होऊन, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारचा या नामांतराबाबतचा प्रस्ताव रद्द करून, नव्याने नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. यात औरंगाबादचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करण्याबाबतचा नव्याने समावेश करण्यात आला होता. आज अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या या सुधारीत प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com