राज ठाकरेंना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधली आणि पोवाडा लिहिला आहे.
Raj Thackeray News, Praveen Gaikwad News, Sambhaji-brigade Latest Marathi News, Raj Thackeray Latest News
Raj Thackeray News, Praveen Gaikwad News, Sambhaji-brigade Latest Marathi News, Raj Thackeray Latest Newssarkarnama

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (ता.1 मे) झालेल्या औरंगाबादमधील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राज्यात राजीपातीचं राजकारण वाढल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का, असा सवालही ठाकरेंनी केला होता. त्याला संभाजा ब्रिगेडून प्रत्युत्तर देण्यात आले असून राज ठाकरे हे महाराष्ट्राक खोटे इतिहास सांगून वातावरण बिघडवत आहेत. त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी संभीजी ब्रिगेडचे (Sambhaji-brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. (Sambhaji-brigade Latest Marathi News)

Raj Thackeray News, Praveen Gaikwad News, Sambhaji-brigade Latest Marathi News, Raj Thackeray Latest News
मनसेच्या हनुमान चालिसा पठणात हिंदू संघटनाची माघार : विहिंप

गायकवाड म्हणाले की, सद्ध्या महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली आहे. राज ठाकरे हे खोटा इतिहास सांगून राज्यातील वातावरण बिघडवत आहेत. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांच्या समाधी शोधली आणि पोवाडा लिहिला. लोकमान्य टिळक आणि पुण्यातील लोकांनी पैसे गोळा केले. १९२० ला टिळक गेले. मात्र, पैशाचा उपयोग झाला नाही. ठाकरे हा खोटा इतिहास सांगत आहे. याचबरोबर जेम्स लेनचे २००३ ला पुस्तक आले. या पुस्तकावरून वाद झाला. जेम्स लेन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पितृत्वाबाबत लिहतो. असेच राजा शिवछत्रपती पुस्तकात पुरंदरे यांनी लिहिलं आहे. शहाजीराजे अनुपस्थित होते, असे पुरंदरे यांनी कादंबरीमध्ये लिहलं आहे. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख करण्यात आला आहे, अशी टीका गायकवाड यांनी ठाकरेंवर केली.

Raj Thackeray News, Praveen Gaikwad News, Sambhaji-brigade Latest Marathi News, Raj Thackeray Latest News
'बालवाडीही सुरू न करू शकलेल्या राज ठाकरेंचे पवारांवरील आरोप बालिशपणाचे'

शरद पवारांना जातीयवादी म्हणणाऱ्या राज ठाकरेंची स्क्रिप्ट कोण लिहितात. शाहू फुले नाव घेणारे बहुजनवादी आहेत तर हिंदू-मुस्लिम करणारे जातीयवादी आहेत. पुण्यात आम्ही दोन वेळा जाहीर व्याख्यान ठेवले आणि पुरंदरे यांना इतिहास चर्चेला बोलवलं होते पण ते चर्चेला आले नाही. खोटा इतिहास लिहायचा बदनामी करायची. आता विषय संपला आहे. पवार साहेबांना जातीयवादी बोलणे चुकीचे आहे. पवारांनी बहुजन समाजला न्याय दिला आहे.पवार साहेबांचे धोरण सर्वसमावेशक आहे, अशा शब्दात गायकवाडांनी ठाकरेंना सुनावले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी 1818 मधील एका लिखाणाचा संदर्भ देत शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार टिळकांनी केला नाही, असा दावा केला आहे. याबाबत आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती. पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली .पत्र व्यवस्थित वाचा, असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याबाबतचे एक पत्रही त्यांनी ट्विट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com