मोठी बातमी : शिवसैनिक आक्रमक झाल्याने राणा दांपत्य माघार घेण्याच्या तयारीत?

शिवसैनिक आक्रमक झाल्याने राणा दांपत्य माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
ravi rana, navneet rana
ravi rana, navneet ranasarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष पेटला आहे. या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले असून, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आज माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ते आजच्या ऐवजी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना आणि शिवसैनिकांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मातोश्रीबाहेर जाणारच असा ठाम निर्धार राणा दांपत्याने काल (ता.22) पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. परंतु, आता शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले आहेत. काल रात्रीच भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर मातोश्रीसमोरच शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यानंतर राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानासमोरील बॅरिकेडही शिवसैनिकांनी तोडले होते. या पार्श्वभूमीवर राणा दांपत्याने आज माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी आज सकाळी घरीच हनुमान चालिसा म्हटला आणि मातोश्रीवर जाणे उद्यावर ढकलले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ravi rana, navneet rana
शिवसैनिकांनी हल्ला केलेल्या मोहित कंबोज यांच्या पाठीशी आता नितेश राणे!

शिवसैनिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी सध्या राणा दाम्पत्याला घरातच नजरकैदेत ठेवलं असून 10 ते 12 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस असा मोठा फौजफाटा त्यांच्या घरामध्ये तैनात करण्यात आला आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावरील पोलीस बंदोबस्त राणा यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे. नवनीत राणा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर न पडण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही त्यांनी भूमिका न बदलल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्याला नजरकैदेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ravi rana, navneet rana
शिवसैनिकांनी हल्ला करताच कंबोज यांची पोलिसांकडे धाव अन् म्हणाले, मी घाबरत नाही!

याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. वळसे पाटील यांनी सर्वांना शांततेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी काही आरोप देखील केले आहेत. हे कोणाच्या तरी सांगण्यावरून सुरू आहे. राणा दाम्पत्याने कोणाची तरी सुपारी घेतली असावी. समाजात असंतोष निर्माण करण्याचे हे कृत्य आहे, असे वळसे पाटलांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com