Ranjit Savarkar : स्वातंत्र्यवीरांचे नातू राहुल गांधींविरोधात पोलिसांत जाणार

Ranjit Savarkar : हिंदुत्ववादी शक्तींकडे सत्ता आली. साधारण वाजपेयी सरकार आल्यानंतर या भूमिकेला सुरुवात झाली.
ranjit savarkar latest news
ranjit savarkar latest newsSarkarnama

ranjit savarkar : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत त्यांनी सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विराधात ते गेले. त्यांनी इंग्रजांसोबत काम केले. ते तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा खरे सावरकर समोर आले. त्यांनी इंग्रजांना पत्रे लिहिली. त्यांच्यासोबत हात जोडले. इंग्रजांसोबत काम करायला तयार असल्याचे सांगितले म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधी यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे.(ranjit savarkar latest news)

भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरवात केली आहे. शिंदे गटाने पुणे, ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन सुरु केले आहे. तर दुसरीकडे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात ते पोलिसात तक्रार देणार आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला आहे.

रणजित सावरकर म्हणाले, "हिंदुत्ववादी शक्तींकडे सत्ता आली. साधारण वाजपेयी सरकार आल्यानंतर या भूमिकेला सुरुवात झाली की, सावरकरांनी माफी मागितली. सावरकरांनी असे केले. तोपर्यंत कोणी काही म्हणत नव्हते. तर ही एक प्रतिक्रिया होती. त्यानंतर पुन्हा दहा वर्ष यांचे सरकार नव्हते. तेव्हा हे आरोप बंद झाले. 2014 साली हे सरकार जेव्हा आले. तेव्हा हे आरोप सुरू झाले. तेव्हा हा सत्तेचा खेळ आहे. सत्तेच्या खेळात तुम्ही महापुरुषांचा अपमान करताय, हे तुम्हाला लक्षात येत नाही,"

पुणे, ठाण्यात गांधी यांच्याविरोधात आंदोलन

पुण्यातील सावरकर चौकात शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शिंदे गटाने राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या, यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. ठाण्यातही आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

ठिकठिकाणी आंदोलन करा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी. हे राज्य कायद्याचं आणि सावरकरांचं आहे असं दाखवून देऊया, असं ठाकरे गटात सामील झालेले खासदार राहुल शेवाळे म्हणाले आहेत. राहुल गांधीच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com