उद्धव ठाकरेंना बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी होती !

"उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन नागरिकांना संबोधित करायला हवं होतं," असे चव्हाण म्हणाले.
uddhav thackeray, prithviraj chavan
uddhav thackeray, prithviraj chavansarkarnama

मुंबई : "उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सभागृहात यायला हवं होतं. आपली बाजू मांडायला पाहिजे होती. मग मतदान घ्यायचं नसतं, तर राजीनामा द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांची बाजू विधीमंडळाच्या माध्यमातून कळाली असती," असे मत कॉग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी व्यक्त केले.

"विरोधी पक्षनेते बोलले असते. इतर पक्षाच्या नेत्यांना बोलायची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केलं होतं, हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आलं असतं. दोन चार तास सभागृह चाललं असतं आणि त्यानंतर जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला असता, तरी चाललं असतं." असे चव्हाण म्हणाले. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी चव्हाण बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "एकनाथ शिंदे हे काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं सांगत असले, तरी ते खोटं आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. अनपेक्षितपणे संधी आली, पण त्यांना संधी मिळाली नाही," "उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन नागरिकांना संबोधित करायला हवं होतं," असे चव्हाण म्हणाले.

uddhav thackeray, prithviraj chavan
सत्ताबदलाने तीनचा प्रभाग पुन्हा चारचा होणार ?

"महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना पाठिंबा दिला. त्यांना स्वीकारलं. त्या जनतेला सांगायला हवं होतं. फेसबुक लाईव्ह करणं आणि विधिमंडळात बोलणं यात फरक आहे. विधिमंडळात बोललेलं ऐतिहासिक रेकॉर्ड राहतं. ते करायला पाहिजे होतं. त्यांना विधिमंडळाची परंपरा काही जास्त माहिती नव्हती," असे चव्हाण यांनी सांगितलं.

"शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्यायला उशीर झालेला आहे. एकनाथ शिंदेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर राग काढला, तो काही खरा नव्हता. खरं कारण होतं की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं," असे चव्हाण म्हणाले.

हा नेतृ्त्वाचाही प्रश्न

एकनाथ शिंदे आणि इतके आमदार का गेले? हे नंतर चर्चिलं जाईल, पण हा नेतृ्त्वाचाही प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी आधीच जर म्हटलं असतं की, काँग्रेस- राष्ट्रवादीमुळे माझे लोक नाराज आहेत. तर ते आम्ही मान्य केलं असतं. भाजपला थांबवण्यासाठी आमची बाहेरू पाठिंबा देण्याची तयारी होती, असे चव्हाण यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

  • ठाकरे यांची संघर्ष करण्याची इच्छा राहिलेली नाही. त्यांनी जे कारण सांगितलं की, रक्तपात होईल वगैरे, हे सगळं खोटं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर लढाई राहिलीच नव्हती. हा निर्णय अपेक्षितच होता. माझी ही नाराजी नाहीये. ही वैयक्तिक भावना आहे.

  • "इतक्या मोठ्या प्रमाणात माणसं नाराज आहेत, याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे त्या शॉकमधून ते बाहेरच निघाले नाहीत. सारखं म्हणत राहिले की, माझ्या माणसांनी दगा दिला. खाली काय चाललं होतं, याचा त्यांना अंदाज आला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com