राज ठाकरेंनी आता कोणाची सुपारी घेतली, हे फडणवीसच सांगतील : पटोलेंचा टोला

मी हिंदू आहे आणि दररोज हनुमान चालिसा म्हणतो, पण त्याचा कधी गाजावाजा करत नाही.
Nana patole-Raj Thackeray-Devendra Fadnavis, Nana Patole on Raj Thackeray, Nana Patole News Updates
Nana patole-Raj Thackeray-Devendra Fadnavis, Nana Patole on Raj Thackeray, Nana Patole News UpdatesSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याअगोदर सुपारीबाज असे म्हटले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता कोणाची सुपारी घेतली आहे, हे फडणवीसच सांगू शकतील, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ठाकरे आणि फडणवीस यांना लगावला. (Only Fadnavis will tell whose betel nut Raj Thackeray has taken now : Nana Patole)

नाना पटोले हे मुंबईत पत्रकारांशी संवाद होते, त्यावेळी त्यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता पटोले यांनी वरील उत्तर दिले. नाना पटोले म्हणाले की, दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले इंधनदरवाढ, महागाई आदी मुद्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. त्यामाध्यमातून वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र असून जे लोक राज्यातील सामाजिक एकोपा, शांतता, सौहार्द संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. संविधानाने प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे, पूजा, प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मी हिंदू आहे आणि दररोज हनुमान चालिसा म्हणतो, पण त्याचा कधी गाजावाजा करत नाही. प्रार्थना करण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. (Nana Patole on Raj Thackeray)

भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. मोदी सरकार हे महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यात कुचकामी ठरले आहे. त्यांचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढला जात आहे. धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये. धार्मिक द्वेष पसरवून मुख्य मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे हाच भाजपाचा अजेंडा आहे. पण, त्यांच्या अजेंड्याला जनता बळी पडणार नाही. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला देशभरात एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपचे षडयंत्र जनतेला समजले आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात कायदा हातात घेऊन दंगली घडवण्यात आल्या. त्यात कोण लोक होते, हे सर्वांनी पाहिले आहे. असे प्रकार करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातही झाले पण, महाराष्ट्रातील सक्षम सरकारने त्यांचे हे मनसुबे उधळून लावले. राज्य सरकारने सर्व धर्माच्या धर्मगुरुंना बोलावून चर्चा करावी व योग्य तो मार्ग काढावा. तसेच महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांवर कारवाई करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com