जेम्स लेननी त्या पुस्तकातील एक पान फाडून टाकावे; आमचे काही म्हणणे नाही : आव्हाड

महाराष्ट्रात पुन्हा एकदा जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे.
 Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. यानिमित्ताने मनसे (MNS) आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पुस्तकाचे लेखक जेम्स लेनने या वादावर भाष्य केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आपल्या माहितीचे स्त्रोत नव्हते, असे म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य केले आहे.

आव्हाड म्हणाले, जेम्स लेन याची ज्यांनी मुलाखत घेतली आहे. त्यांना एवढचं सांगायच आहे. गलिच्छ लिखाण काढून टाकावे. ज्यांनी मुलाखत घेतली त्यांनी ते पुस्तक वाचावे, प्रत्येक वाक्य शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले. हे लिखाण महाराजांविषयी शंका निर्माण करणारे आहे, असे ते म्हणाले.

 Jitendra Awhad
सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्यास ११ लाखांचे, तर बांगड्या भरणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस!

बहुजनांच्या मुलांनी 2000 नंतर पीएच.डी. केली. त्यानंतर त्यांनी संशोधन केले. गेलेल्या माणसांबदल बोलणे बरोबर नाही. माझे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे वैयक्तिक वैर नव्हते. विचारांचे वैर असणे लोकशाहीचा भाग आहे. आजपर्यंत मी हे पान वाचून दाखवले नव्हते. जेम्स लेनच्या पुस्तकातील एक एक वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आहे. हे पुस्तक माझे तोंडपाठ आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहासाचा बट्टाबोळ केला. त्यांच्याबद्दल मला आता काही बोलायचे नाही, असेही आव्हाड म्हणाले.

महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण जेम्स लेन याने केले. बहुजनांमध्ये 70, 80 च्या दशकात शिक्षण नव्हते, 2000 नंतर बहुजनांच्या पोरांनी शिक्षण घेतले. पीएच.डी. केल्यानंतर त्यांनी हे शोधून काढले.

जेम्स लेनला त्यांनी आता शोधले असेल. जेम्स लेन कुठून आला माहित नाही. तुम्ही आणला असेल. शोधला असेल, अमेरिकेत कुठे राहत असेल. महाराष्ट्राच्या वतीने जेम्स लेनला एवढेच सांगायचे आहे की एक पान फाडून टाक आणि त्यानंतर दुसरी आवृत्ती काढ. आमचे काही म्हणणे नाही. हा विषय आम्ही काढला नाही. बाबासाहेब पुरंदरे गेल्यावर मी श्रद्धांजलीही वाहिली. लोक खूप हुशार आहेत. मला काही बोलायचे नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.

 Jitendra Awhad
मोदीजी कट्टरवाद्यांना आवरा...देशातील महत्वाच्या नेत्यांनी केले आवाहन..

देशाच्या हिरोबद्दल असे लिखाण करणे, कोणालाही मान्य नाही. शोषितांचे साहित्य पहिल्यांदा साहित्यात महात्मा फुलेंनी आणले. महिलांसाठी पहिली शाळा फुलेंनी उघडली. सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचे नाही, असेही आव्हाड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com