मुंबई : ओबीसी आरक्षणात मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला त्याचपध्दतीने महाराष्ट्राला न्याय मिळेल, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
जनता दरबारासाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता ओबीसी आरक्षणाबाबत पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधला. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी मागच्या पाच वर्षात काहीतरी केलं असतं तर १२ कोटी जनतेला भाजप विषयी विश्वास पटला असता, असा टोलाही श्री. मुंडे यांनी लगावला.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना ओबीसी आरक्षणाचे प्रकरण कोर्टात सुरू होते त्यावेळी तत्कालीन भाजपच्या सरकारने काय केलं. यामध्ये भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करून ते म्हणाले, आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आघाडी सरकार करत आहे.
न्यायालयात साक्षीपुरावे करत असताना इंपिरिकल डाटा, अहवाल किंवा ट्रिपल टेस्ट करण्यासंदर्भात तत्कालीन भाजप सरकारने काय केले तर काहीच नाही, म्हणून तर आमच्या सरकारच्या काळात निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आघाडी सरकार काम करत आहे, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.