Rohit Pawar : आंबेडकरांमुळेच भाजपचे ७ खासदार,२२ आमदार निवडून आले..; पवार म्हणाले..त्यांना आत्मपरीक्षण..

NCP News : अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होऊ नये, यासाठी सगळ्यांनी एकत्रित आले पाहिजे..
Rohit Pawar, Prakash Ambedkar
Rohit Pawar, Prakash AmbedkarSarkarnama

Rohit Pawar slams Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकमेकांच्या विरोधातील प्रतिक्रिया अनेकवेळा येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी आता आंबेडकरांना एक सल्ला दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी ‘आपलं शरद पवार यांच्याशी जुनं भांडण’ असल्याचं जाहीरच सांगितलं. आंबेडकरांनी ठाकरे गटाशी युती केली असली तरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसने याबाबत भूमिका घेतलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला आहे. "प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्हालाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होऊ नये, यासाठी सगळ्यांनी एकत्रित आले पाहिजे," असे रोहित पवार म्हणाले.

"प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं खाल्लेल्या मतांमुळे भाजपचे सात खासदार आणि २२ आमदार निवडून आले," असे पवारांनी नमूद केले.

Rohit Pawar, Prakash Ambedkar
Drugs-on-cruise case : मलिकांनी वानखेडेंवर केलेले आरोप खरे ठरत आहेत..; रोहित पवार म्हणतात..

काल (शनिवारी) आगामी लोकसभा निवडणुकींबाबत प्रकाश आंबेडकर यांनीमोठा दावा केला आहे. विरोधकांना निवडणूक लढवण्यासाठी निधीच मिळू नये, म्हणून भाजपाने नोटंबदीचा निर्णय घेतला आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. राजकीय पक्षांनी गाफील राहू नये, असा इशारा देत लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत केलं. ते शनिवारी (२० मे) अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.

Rohit Pawar, Prakash Ambedkar
PM modi : जगातील सर्वात लोकप्रिय नेते मोदीच ! ; बायडन यांनाही टाकलं मागे, ऋषि सुनक पहिल्या दहामध्येही..

“भाजपाने कोंडीचं राजकारण सुरू केलं आहे. आरबीआयने घेतलेला दोन हजार रुपयांच्या नोटेबाबतचा निर्णय हा विरोधकांना निधीच मिळू नये यासाठी भाजपाने केलेला खेळ आहे. इथल्या राजकीय पक्षांनी गाफील राहू नये.” असे आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी दोन हजारच्या नोटाबंदीवरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंबेडकर म्हणाले, “विरोधकांना निधी मिळू नये आणि त्याचबरोबर विरोधकांकडे निधी येऊच नये, या दृष्टीने टाकलेला हा खेळ आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षाने गाफील राहू नये. ऑक्टोबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतीलच असं सूचक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com