राजकारणाची घसरती पातळी चिंताजनक! आव्हाडांनी दाखवला आरसा

मुंबईत सध्या शिवसैनिक विरुद्ध राणा दांपत्य असा सामना रंगला आहे.
 Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष पेटला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधकांना आरसा दाखवला आहे. राजकारणाची घसरती पातळी चिंतानजक असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलच नव्हे तर एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या स्थितीत मुंबईत सुरू असलेल्या वादावर आव्हाडांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, शरद पवारसाहेब आणि मातोश्री बद्दल थोडेसे वेडेवाकडे बोला...सगळीकडे हेडलाईन मिळवा...चर्चेत या. राजकारणाची घसरती पातळी चिंताजनक आहे.

आजचे भाव

पेट्रोल - ₹125

डिझेल - ₹97

गॅस - ₹1050

ह्याचं काय

 Jitendra Awhad
अखेर ठरलं! सरकारी खर्चानं राणा दांपत्याची अमरावतीला होणार रवानगी

दरम्यान, अपक्ष आमदार रवी राणा, त्यांच्या पत्नी अपक्ष खासदार नवनीत राणा विरुद्ध शिवसैनिक हा सामना सुरू असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. गृहमंत्री वळसे पाटील आज कोल्हापूर येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्वतः गृहमंत्री संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना सुरक्षितपणे अमरावतीला पोचवणे ही गृह खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे राणा दांपत्याला सुखरूप राज्य सरकार अमरावतीला पोचवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 Jitendra Awhad
राणा दांपत्य विरुद्ध शिवसेना वादात प्रियांका चतुर्वेदींची उडी अन् केली कोंडी

शिवसेना आणि शिवसैनिकांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मातोश्रीबाहेर जाणारच असा ठाम निर्धार राणा दांपत्याने काल (ता.22) पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. परंतु, आता शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले आहेत. काल रात्रीच भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर मातोश्रीसमोरच शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यानंतर राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानासमोरील बॅरिकेडही शिवसैनिकांनी तोडले होते. या पार्श्वभूमीवर राणा दांपत्याने आज माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी आज सकाळी घरीच हनुमान चालिसा म्हटला आणि मातोश्रीवर जाणे उद्यावर ढकलले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com