राणा दांपत्याच्या आंदोलनातील जयंत पाटलांनी हवाच काढून घेतली!

सध्या शिवसैनिक विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष सुरू असून, यामुळे वातावरण तापले आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष पेटला आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राणा दांपत्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगून जयंत पाटील म्हणाले की, राणा दांपत्य कसे आहे, हे अमरावतीकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले. त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये. निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच बाजू बदलली. त्यामुळं त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा तपास करायला हवा. असा हल्ला होणे ही चुकीची बाब आहे. असे असले तरी ती गाडी सिग्नलवर थांबलेली असताना हल्ला होतो आणि लगेच गाडी निघून जाते, या बाबी तपासणे गरजेचे आहे.

Jayant Patil
मोठी बातमी : शिवसैनिक आक्रमक झाल्याने राणा दांपत्य माघार घेण्याच्या तयारीत?

शिवसैनिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी सध्या राणा दांपत्याला मुंबईतील खारमधील घरातच नजरकैदेत ठेवलं असून 10 ते 12 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस असा मोठा फौजफाटा त्यांच्या घरामध्ये तैनात करण्यात आला आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावरील पोलीस बंदोबस्त राणा यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे. नवनीत राणा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर न पडण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही त्यांनी भूमिका न बदलल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्याला नजरकैदेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jayant Patil
शिवसैनिकांनी हल्ला केलेल्या मोहित कंबोज यांच्या पाठीशी आता नितेश राणे!

याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. वळसे पाटील यांनी सर्वांना शांततेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी काही आरोप देखील केले आहेत. हे कोणाच्या तरी सांगण्यावरून सुरू आहे. राणा दाम्पत्याने कोणाची तरी सुपारी घेतली असावी. समाजात असंतोष निर्माण करण्याचे हे कृत्य आहे, असे वळसे पाटलांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com