एसटी संपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; विलीनीकरणावर मांडली रोखठोक भूमिका

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
Sharad Pawar, NCP President.
Sharad Pawar, NCP President.Sarkarnama

नाशिक : एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हजारो एसटी बस आगारातच उभ्या आहेत. याचा जबर फटका प्रवाशांनाही बसत आहे. एसटी कमर्चारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने हा संप चिघळतच चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी विलीनीकरणाचा मुद्दा प्रथमदर्शनी तरी योग्य नसल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले, परिवहन मंत्र्यांनी मला सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यातील एक मागणी वगळता इतर सर्व प्रश्नांवर वाटाघाटी झालेल्या आहेत. मात्र विलीनीकरणाच्या प्रश्नावर एकमत झालेले नाही.

Sharad Pawar, NCP President.
त्रिपुरा कथित घटनेबाबत शरद पवार म्हणाले... ;पाहा व्हिडिओ

ज्या संस्थेत आपण कामाला लागलो, त्या संस्थेतून इतर ठिकाणी आपली नोकरी वर्ग करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. पण विलीनीकरणाचा मुद्दा आज प्रथमदर्शनी तरी योग्य आहे, असे मला वाटत नाही, अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.

एसटीचा इतके दिवस संप सुरू आहे. त्यात न्यायालयाचाही निकाल येत आहे. तरीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेणे म्हणजे एकप्रकारे कामगारांचे नुकसान करण्याला मदतच करण्यासारखे आहे. म्हणून राज्य सरकार आणि एसटीच्या प्रातिनिधिक आणि अन्य संघटनांनी एकत्र बसून यातून मार्ग काढला पाहिजे, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar, NCP President.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाणीचा इशारा; राजधानीसह पाच राज्यांवर लॉकडाऊनचे ढग

हा संप थांबला पाहिजे. नागरिकांच्या यातना वाढलेल्या आहेत. कार्तिकी एकादशीला शेकडो बस जात असतात. आज भाविकांना दर्शन घेण्यासाठी जाताना अडचणी निर्माण होत आहेत. गेली अनेक वर्षे अत्यंत सेवभावी वृत्तीने एसटीने काम केले, त्याबद्दल लोकांच्या मनात आस्था आहे. या आस्थेला कुठेतरी धक्का पोहचत आहे. ताणावे, पण तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहन पवार यांनी संपकरी कामगारांना केले.

दरम्यान, विलीनीकरणाच्या मागणीबाबत विचार कऱण्यासाठी राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन केली आहे. ही समिती 12 आठवड्यांत अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यासह परिवहन मंत्र्यांनीही केले आहे. पण कामगार संपावर ठाम आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com