परमबीर सिंहांना फरार घोषित करण्यासाठी CID नंतर गुन्हे शाखेच्याही हालचाली सुरु

मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला.
 Param Bir Singh
Param Bir Singhsarkarnama

मुंबई : आठ महिन्यापासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) सुरु असताना आता मुंबईच्या गुन्हे शाखेनं न्यायालयात अर्ज दाखल करुन परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज दाखल केला आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Mumbai police) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल आहे. 'खंडणीच्या गुन्ह्यात आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपी असलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे फरार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात यावे', असा अर्ज शनिवारी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीच्या वसुलीचा आरोप परमबीर सिंह यांनी केल्यानंतर देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारने नेमलेला चांदिवाला आयोग करीत आहे. चांदिवाला आयोगाने परमबीर सिंह यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले पण परमबीर सिंह एकदाही चौकशीला आले नाहीत. . मे महिन्यापासून परमबीर सिंह कुठे आहेत हे पोलिसांनाही माहीत नाही.

 Param Bir Singh
Children's Day 2021: पंडित नेहरुंविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे परमबीर सिंह यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी राज्य सीआयडी करीत आहे. सीआरपीसीच्या कलम 82 आणि 83 नुसार परमबीर सिंहांना फरार घोषित करण्यात येईल.

गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की...

'आरोपी परमबीर सिंह, विनय सिंह व रियाज भाटी या तिन्ही आरोपींचा शोध घेऊनही ते सापडलेले नाहीत. या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, १२०-ब व ३४ अन्वये गुन्हा नोंद आहे. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर ते बजावण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्या अधिकाऱ्याने तिन्ही आरोपींना त्यांच्या अखेरच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला असता ते तिथे आढळले नाहीत. तिघांचाही थांगपत्ता लागेनासा झाला आहे. परमबीर यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील घरातील त्यांचा सुरक्षारक्षक सतीश बुरुटे व खानसामा रामबहादूर थापा यांनी परमबीर व त्यांचे कुटुंब मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचप्रमाणे रियाझ भाटी व विनय सिंग यांच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही घरी परत आले नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे हे तिघेही फरार झाल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांना फरार घोषित करण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम ८२ व ८३ अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com