Maharashtra Politics: 'अतिशहाणे' मंत्री म्हणत संजय राऊतांचा मुनगंटीवारांवर हल्लाबोल ; म्हणाले,''कानामधील बोळे काढून..''

Sanjay Raut On Sudhir Mungantiwar : ...तर फेब्रुवारीपर्यंत हे सरकार पडेल असं मी म्हणालो आहे.
Sudhir Mungantiwar and Sanjay Raut
Sudhir Mungantiwar and Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut On Sudhir Mungantivar : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांकडून शिंदे आणि फडणवीस सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल असं भाकित केलं आहे. यावर मंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राऊंताना आम्ही आणखी मुदत वाढवून देतो. फेब्रुवारी नाही तर 15 मार्चपर्यंत हे सरकार पाडून दाखवा असं खुलं आव्हान दिलं होतं. मात्र, आता याच आव्हानाचा संदर्भ देत संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुनगंटीवारांवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊतांनी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसह विविध मुद्दयांवर भाष्य केलं. राऊत म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमधील एक अतिशहाणे मंत्री म्हणाले, संजय राऊतांनी मार्चपर्यंत शिंदे फडणवीस सरकार पाडून दाखवावं,पण त्यांनी कानामधील बोळे काढून, कान साफ करून माझं बोलणं जरा नीट ऐकावं. नाहीतर कानकोरणे पाठवतो. मी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली तर फेब्रुवारीपर्यंत हे सरकार पडेल असं मी म्हणालो होतो.

Sudhir Mungantiwar and Sanjay Raut
Bhandara : काकूला चीत करून पुतण्या झाला उपाध्यक्ष, राष्ट्रवादीतील बंडखोरी वाढीवर !

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेना पक्ष फोडण्यात आला, पैशाचा वारेमाफ वापर करत हे खोकेबाज सरकार सत्तेत आले. या खोकेबाजांविरोधात आम्ही पहिल्या दिवसापासून न्यायालयात लढाई लढत आहोत. निवडणूक आयोगाकडे न्याय मागत आहोत.निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवायला हवा. आणि आयोगासमोरील सुनावणीत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल अशी खात्री असल्याचंही राऊत म्हणाले.

Sudhir Mungantiwar and Sanjay Raut
Bachhu Kadu: मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंचं सूचक विधान, म्हणाले, ''यंदाच्या वर्षी...''

शिंदे फडणवीस सरकारचा मृत्यू अटळ, कारण...

शिंदे फडणवीस सरकारचा मृत्यू अटळ आहे. कारण हे सरकार जिवंत नसून त्याचा प्राण मुर्दयात गुंतलेला प्राण अशी घणाघाती टीकाही यावेळी करतानाच आम्ही सर्व प्रकारच्या लढाईसाठी तयार आहोत असेही राऊत म्हणाले. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात घटनाबाह्य सरकार आलं असून ते भष्टाचार करत आहे, जे निर्णय घेत आहे ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाहीत. त्यामुळे भविष्यात आपण जागतिक पातळीवर कोणते आदर्श निर्माण करत आहोत.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले होते?

शिंदे आणि फडणवीस सरकार फेब्रुवारीपर्यंत पडेल असं राऊतांनी म्हटलं आहे. पण आम्ही त्यांना आणखी मुदत वाढवून देतो. फेब्रुवारी नाही तर 15 मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा. सरकार फेब्रुवारीनंतर टिकलं तर ज्या लेखणीने तुम्ही सामना पेपरमध्ये लिहिता. त्याच लेखणीने एक वाक्याचा राजीनामा तुम्ही देणार का? मी तुम्हाला आवाहन देतोय, तुमच्याकडे ताकद असेल शक्ती असेल, तसंच तुम्ही स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा सांगणारे असाल तर 15 मार्चपर्यंत सरकार पाडा, अन्यथा तुमचा वारसा नकली आहे असं मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com