Sanjay Raut : शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाजपमध्ये जाणार ; राऊत असं का म्हणाले..

Sanjay Raut : शिंदे यांच्या गटात कसे वाद सुरू आहे, कशी घालमेल सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. हे सरकार टिकणार नाही..
Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Raut, Eknath Shindesarkarnama

Dipak Kesarkar : शिंदे गटाचे नेते, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (dipak kesarkar) यांनी रविवारी शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना 'उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे,' असे विधान केले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केसरकरांना प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut news update)

"पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. शिंदेंनी आमदारांची मने जिंकली. त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्यासोबत गेलो. अस काय घडलं की, आम्ही त्यांच्याबरोबर गेलो याचे उत्तर आम्ही वेळ आल्यावर देऊ. ते काय घडल याच आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करावे, असे केसरकर रविवारी शिर्डी येथे म्हणाले होते.

Sanjay Raut, Eknath Shinde
NCP News : अजितदादांना डिवचणाऱ्या राणेंना राष्ट्रवादीनं फटकारलं ;"उंची आणि लायकी पाहून.."

राऊत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कसे वाद सुरू आहे. त्यांच्या गटात अजून एक गट निर्माण झाला आहे. केसरकरांनी आत्मपरीक्षण केले म्हणून ते एकत्र येण्याची भाषा करताय. मात्र शिवसेनेत त्यांना जागा नाही,"

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कसे वाद सुरू आहे, कशी घालमेल सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. मी वारंवार सांगतो आहे की हे सरकार टिकणार नाही, आणि हा गटही टिकणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर यांचे अंतिम ध्येय भाजपमध्ये विलीन होणे आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut, Eknath Shinde
Nitesh Rane : "धरणवीर” यांना “धर्मवीर” कसे समजणार ...; राणेंनी अजितदादांना डिवचलं

राऊत म्हणाले, "केसरकरांना वाटतंय शिंदे-ठाकरेंनी सोबत यावे, याचा अर्थ असा की त्यांनी आत्मपरिक्षण केले आहे. त्यामुळेच असे विधान बाहेर पडताय. शिंदे गटात टोळी युद्ध सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचे वक्तव्य म्हणजे वैफल्यग्रस्त असून त्यांच्यामध्ये अजून गट पडले असल्याचे दिसून येत आहे. तर 16 आमदार अपात्र ठरतील कारण आमची कायदेशीर बाजू अगदी सक्षम आहे,"

Sanjay Raut, Eknath Shinde
Municipal elections : नगरपालिका निवडणुका यासाठी पुढे ढकलल्या जाताहेत ; माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण..

"उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे.आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेने ठरवलेले आहे जे गद्दार आहे जे सोडून गेलेले आहेत, त्यांना परत विधानसभा किंवा लोकसभेत आणायचं नाही,"असे राऊत म्हणाले.

"हे सरकार टिकणार नाही, हा गट देखील टिकणार नाही.शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःला विलीन करून घेतील व हेच त्यांचे ध्येय आहे. कारण शिवसेना त्यांना पुन्हा स्वीकारणार नाही व दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही,"असे राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com