केंद्राच्या 'त्या' निर्णयाचे खासदार अमोल कोल्हेंकडून स्वागत

सोयाबीनमध्ये झालेल्या भाव वाढीमुळे पोल्ट्री उद्योगांनी सोया पेंड आयात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
केंद्राच्या 'त्या' निर्णयाचे खासदार अमोल कोल्हेंकडून स्वागत

पुणे: "सोयाबीन पेंड आयात करण्याचा निर्णय रद्द केल्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे, केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पोल्टी उद्योगासाठी खाद्य म्हणून सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र सोयाबीनमध्ये झालेल्या भाव वाढीमुळे पोल्ट्री उद्योगांनी सोया पेंड आयात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीनंतर केंद्र सरकार ऐन सोयाबीन हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोया पेंड आयात करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर शेतकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

केंद्राच्या 'त्या' निर्णयाचे खासदार अमोल कोल्हेंकडून स्वागत
शेतकऱ्यांच्या दबावापुढे सरकार झुकले : सोयाबीन पेंडेची आयात नाही; उत्पादकांची दिवाळी

शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर अमोल कोल्हे यांनीही संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मागणी लावून धरत केंद्र सरकारवर टीका केली होती. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बोलताना साडेपाच लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा आहे, अशी घणाघाती टीका केली होती. त्याचबरोबर या निर्णयाचा फेरविचार करावा मागणी केली होती.

''आधीच चक्रीवादळ व अतिवृष्टीचा फटका‌ बसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला होता. अशातच सोयाबीनची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सोयाबीनचे दर कोसळले. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार होते. त्यामुळेच संसदेत शेतकऱ्यांचा आवाज उठविण्याची गरज होती. त्यामुळेच मला संसदेत कठोर टीका करावी लागली आणि केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयाने ती सार्थकी लागली, '' अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी दिली आहे.

त्यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सोयाबीन पेंड आयात करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे जाहीर केल्याने अडचणीत आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com