प्रत्येकवेळी हिंदूंनी गोळ्या खायच्या का ? संरक्षण देणे शक्य नसेल तर बंदुका द्या ; मनसे आक्रमक

काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. ते गोळ्या घालणार आणि हिंदूंनी केवळ बघत बसायचे का ?
Sandeep Deshpande News, MNS News in Marathi
Sandeep Deshpande News, MNS News in MarathiSarkarnama

-शर्मिला वाळुंज

डोंबिवली : जम्मू काश्मीरमध्ये दोन बिगर काश्मिरींची हत्या झाली. या घटनेवर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर (bjp) निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काश्मिरी पंडितांची हत्येवरुन संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Sandeep Deshpande latest Marathi news)

"काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. तेथील हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे. ते गोळ्या घालणार आणि हिंदूंनी केवळ बघत बसायचे का ? असा सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. ते कल्याण येथे बोलत होते.

ते म्हणाले, "हिंदूंना स्वसंरक्षणाचा अधिकार नाही का ? हिंदूंना मारणाऱ्याकडे विना परवान्याचे शस्त्र असतील तर आम्हाला बंदुका आणि परवाने द्या, स्वसंरक्षण करण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिला आहे. प्रत्येकाला संरक्षण देणे केंद्र सरकारला शक्य नसेल तर बंदुका तरी द्या. प्रत्येक वेळी हिंदूंनी काय गोळ्या खायच्या का?"

Sandeep Deshpande News, MNS News in Marathi
घोडेबाजारासाठी पैसा कुठून येतो ? ; आमदारांना प्रलोभन दाखवणारे सुत्रधार कोण ?

काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांचे हत्या सत्र सुरु आहे. केंद्र सरकारने येथील हिंदूंना शस्त्र परवाने देऊन हाती बंदुका द्याव्यात अशी मागणी ट्विटरद्वारे त्यांनी सरकारकडे केली होती. याविषयी त्यांनी पुन्हा कल्याणमध्ये केंद्र सरकारला टार्गेट केले आहे.

मनसेच्या कामगार संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी कल्याणमध्ये शुक्रवारी आंदोलन छेडले असून त्या कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रशासनाची भेट घेण्यासाठी मनसे नेते संदिप देशपांडे व संतोष धुरी कल्याणमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

दिपाली सय्यद यांच्यावर टीका

केंद्र सरकार बरोबर राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांचांही त्यांनी खरपूस समाचार घेतला. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून भाजपा व मनसेवर आरोप करीत आहेत. सय्यद यांच्याविषयी देशपांडे म्हणाले,"काही लोकांबद्दल न बोललेलंच चांगलं. चिखलामध्ये दगड मारला तर आपल्याच अंगावर चिखल उडतो. हे आम्हाला लहानपणी शिकविले होते. त्यामुळे आम्ही कधी चिखलात दगड मारण्याचा प्रयत्न करत नाही,"

पत्रके वाटणे चुकीचे आहे का ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेले पत्रक घरोघरी वाटण्याचे आवाहन पक्षातील पदाधिकाऱ्यांना राज यांनी केले आहे. मुंबईत पत्रक वाटताना पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईविषयी ते म्हणाले, "पोलिसांची ज्या पद्धतीचे मनमानी दादागिरी व हुकूमशाही चाललेली आहे ती निषेधार्ह आहे. पत्रके वाटणे चुकीचे आहे का ? असा सवाल करत ते म्हणाले, शिवसेनेच्या लोकांनी काही केलं तरी चालतं वरुण सरदेसाई यांनी पोलिसांना शिव्या घातल्या तरी चालतात आम्ही पत्रक वाटलं तर आम्हाला ताब्यात घेतल. हुकूमशाही आहे का ? शिवसेनेचं राज्य म्हणजे काय तालिबानी राज्य आहे का असा संतप्त सवाल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com