विधान परिषदेच्या निवडणुकीतही घमासान; आघाडीचे सहा तर भाजपचे पाच उमेदवार

काँग्रेसनेही दोन्ही उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणूकीत चुरस वाढली आहे.
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News, MLC Election News
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News, MLC Election NewsSarkarnama

Vidhan Parishad Elelction 2022

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने दोन्हीही उमेदवार रिंगणात ठेवल्याने आता निवडणूक अटळ आहे. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतल्याने आता भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर आघाडीचे सहा उमेदवार असल्याने या निवडणुकीतही चुरस असणार आहे. (MLC Election Latest Marathi News)

राज्यसभा निवडणुकीत भाजपने चमत्कार घडवत तिसरा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आघाडीकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी काँग्रेसच्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना आग्रही असल्याची चर्चा होती. पण काँग्रेसकडून माघार घेण्यात आली नाही.

Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News, MLC Election News
सदाभाऊ खोत यांची माघार; भाजपचे पाच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात

सदाभाऊ खोत यांनी माघार घेतल्याने आता भाजपला पाचवी जागा जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तर काँग्रेसलाही दुसरी जागा जिंकण्यासाठी दहा मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत होणार आहे.

भाजपकडून आता प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे उमेदवार आहेत. त्यामध्ये लाड हे पाचवे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे मैदानात आहेत.

Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News, MLC Election News
हंडोरेंकडे जमिनीचा तुकडाही नाही; सदाभाऊंकडे 57 लाखांच्या दोन गाड्या अन् चौदा गुन्हे

राज्यात दहा जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दहा जागांसाठी बारा उमेदवारांनी अर्ज भरला होता. राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषदेसाठी भाजप ची तयारी करण्यात आल्याचे सुरूवातीपासून सांगितले जात होते. सहाही उमेदवार जिंकतील असा दावा नेत्यांकडून केला जात होता. पण सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे.

विधान परिषदेबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही वेळापूर्वीच भाजपची बैठक झाली. या बैठकीत खोत यांनी माघार घेण्याबाबतचा निर्णय झाल्याचे समजते. त्यानुसार खोत काही वेळापूर्वीच विधान भवनात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com