
Supreme Court Final Decision : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय दिला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याच्या विधानसभाध्यक्षांकडे आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या बहुमत चाचणीसह इतर निर्णयावर जोरदार ताशेरे ओढले. यावरच आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. "राज्यपालांचं काही चुकलं असेल. मात्र, ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं आहे", अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बच्चू कडू म्हणाले, "न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला दिलासा मिळाला आहे. कोणाचेही निलंबन झाले नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय विधानसभाध्यक्षांकडे आला आहे. हे सरकार अध्यक्षांनीच बनवलं आहे. त्यामुळे या निर्णयाचा वेगळा निर्णय लागणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे".
"जो निर्णय झाला आहे, तो संख्येच्या बळावर झाला आहे. त्यामुळे सरकार अधिक मजबुतीने काम करेल. राज्यपालांचं काही चुकलं असेल. मात्र, ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं आहे", असं बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी घडलेल्या अनेक घडामोडींवर जोरदार ताशेरे ओढले. मात्र, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे.
(Edited By - Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.