ऊर्जा विभागाच्या बैठकीत, केदार आणि वडेट्टीवारांनी केले ऊर्जामंत्र्यांना टार्गेट...

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ऊर्जा विभागाला कशा प्रकारे फायदा होईल, काय उपाय योजना कराव्या लागतील, या अहवाल तयार करण्यास सांगितला आहे.
Vijay Wadettiwar - Wadettiwar - Raut
Vijay Wadettiwar - Wadettiwar - Raut

मुंबई : राज्यातील वीज बिलांच्या थकबाकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नियमित वसुली होत नसल्याने ७९ हजार येवढी थकबाकी झालेली आहे. हा विषय अजूनही गांभीर्याने न घेतल्यास राज्य अंधारात जाण्याची भिती, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत Energy Minister Dr. Nitin Raut यांनी व्यक्त केली आहे. तर वसुलीत ऊर्जा विभाग अपयशी ठरल्याने कॉंग्रेसचेच विदर्भातील मंत्री सुनील केदार Minister Sunil Kedar आणि विजय वडेट्टीवार Minister Vijay Wadettiwar यांनी ऊर्जामंत्र्यांना लक्ष्य केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागावर थकबाकीच मोठं संकट ओढवलं आहे. राज्याची थोडी थोडकी नाही, तर तब्बल 79 हजार कोटीची थकबाकी वसूल झालेली नाही. यातील सर्वाधिक थकबाकी 42 हजार कोटींची शेतीपम्पांची आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक आज सह्याद्रीवर बोलावली होती. या बैठकीसाठी 12 मंत्र्यांना आमंत्रण दिले होते. 

लॉकडाऊनच्या काळात म्हणजे 1 एप्रिल ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ही थकबाकी आणखी आठ हजार कोटींनी वाढली आहे. तर 2014 ला भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हा महाराष्ट्रात 14,154 कोटी रुपये वीज बिलाची थकबाकी होती. भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत ही थकबाकी 36,992 कोटींनी वाढली. परिणामी वीज बिलाची थकबाकी 51,146 कोटींची झाली. मात्र आता ही थकबाकी 79 हजार कोटींवर गेली आहे. याबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास राज्य अंधारात जाईल, अशी चिंता ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी व्यक्त केली. 

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ऊर्जा विभागाला कशा प्रकारे फायदा होईल, काय उपाय योजना कराव्या लागतील, या अहवाल तयार करण्यास सांगितला आहे. हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून निर्णय घेतला जाईल असे, राऊत म्हणाले. कोरोना, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे ही थकबाकी राहिली आहे. या थकबाकीचा ताण आता राज्याच्या तिजोरीवरही पडत असल्याने या संदर्भात महत्वाचे निर्णय लवकरच घेतले जातील असेही राऊत म्हणाले.

वीजनिर्मिती करताना ऊर्जा विभागाच्या अनेक त्रुटींवर कॉंग्रेसच्याच मंत्र्यांनी प्रश्‍न उपस्थित केल्याने कॉंग्रेसमध्ये गटबाजी संपली नाही, असा संदेश जात आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऊर्जामंत्री राऊत यांना टार्गेट केल्याने कॉंग्रेसला घरचा अहेर मिळाला आहे. 

अशी वाढली थकबाकी - (आकडे कोटीत)
- औद्योगिक - 445.3 (मार्च 2014), 2,917 (सप्टेंबर 2021)
- वाणिज्यिक - 285.9 (मार्च 2014), 822 (सप्टेंबर 2021)
- सार्वजनिक पाणीपुरवठा - 817.8 (मार्च 2014), 2,258 (सप्टेंबर 2021)
- कृषी - 10,090.5 (मार्च 2014), 39,157 (सप्टेंबर 2021)
- घरगुती - 806.4 (मार्च 2014), 3,271 (सप्टेंबर 2021)
- पथदिवे - 842.2 (मार्च 2014), 6,271 (सप्टेंबर 2021)
- सार्वजनिक सेवा - 6.4 (मार्च 2014), 235 (सप्टेंबर 2021)
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com