महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा दुखावला; मुख्यमंत्री राजीनामा देणार?

Sanjay Raut | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं विधान हे दळभद्री
Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा दळभद्री विधान केलं आहे. यामुळे महाराष्ट्राचा (Maharashtra) स्वाभिमान पुन्हा दुखावला गेला आहे. असा सवाल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवयारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा राजकारण पेटलं आहे. यावरुन विरोधी पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व घटनाक्रमावर संजय राऊत यांनीही भाजप- शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी एका राष्ट्रीय चॅनेलवर शिवरायांनी पाच वेळा औरंगाबाजेबाची माफी मागितली, हे तुमच्या नजरेतुन का सुटतयं, ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, संभाजी राजे यांचा वारंवार अपमान करायचा, शिवरायांनी औरंगजेबाची कधी माफी मागितली, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे कारण ते भाजपचे सहयोगी आहेत. वीर सावरकरांच्या बाबतीत तुम्ही रस्त्यावर उतरले त्यासाठी तुमचं स्वागत आहे. जोडेही मारले, मग आता तुम्ही कोणाला जोडे मारणार, भाजपच्या प्रवक्त्याला मारणार की राज्यपालांना मारणार, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला,

महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांचा असा अपमान केला छत्रपतींनी मागितली, तर तुमचे पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जयजयकार का करतात, भारतीय नौदलाला त्यांनी जे शिवरायांच्या नौसेनेच बोधचिन्ह कशासाठी दिलयं, महाराष्ट्रात औरंगजेबाच्या, अफजलखानाच्या कबरी तोडण्याची नाटकं कशासाठी करताय, असा संतापही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

स्वाभिमानाचं तुणतुण वाजवत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान, ७२ तास झाले महाराजांचा अपमान करुन पण मुख्यमंत्री आणि त्यांचे चाळीस नेते साधा निषेध करु शकले नाहीत इतके तुम्ही घाबरताय, महाराजांचा हा अपमान पाहता तुम्ही राजीनामे द्यायला पाहिजे होते, कारण हा भाजपने केलेला अपमान आहे, असही राऊत यांनी म्हटलं आहे.

आम्ही महाविकास आघाडीत गेलो म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि म्हणून तुम्ही पक्ष फोडला, इथे तर भाजप आणि त्यांच्या राज्यपालांनी अधिकृतपणे महाराजांचा अपमान केला आहे. राज्यपालांनी एका वर्षात चार वेळा शिवाजी महाराजांच्या अपमान केला आहे. महाराजांनी त्यांनी माफीवीर म्हटलंय तरीही तुम्ही सत्तेला चिटकून बसलेले आहात, महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय, अशी जहरी टीकाही राऊत यांनी शिंदे-फडणवीसांवर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com