Supreme Court Final Decision: सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टानं उघड केला ; शिंदे -फडणवीसांनी राजीनामा द्यावा; ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray on Supreme Court Final Decision : गद्दारांनी फटाके फोडण्याचे कारण का ?
Uddhav  Thackeray on Supreme Court Final Decision
Uddhav Thackeray on Supreme Court Final Decision Sarkarnama

Uddhav Thackeray on Supreme Court Final Decision : सर्वोच्च न्यायालयाने काल महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय दिला. या निर्णयामध्ये कोर्टाने प्रतोद निवड आणि राज्यपालांची भूमिका बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यामुळे आपण स्थिती पूर्ववत आणू शकत नाही, असं म्हणत शिंदे सरकार (Shinde Government) वाचलं असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.

या निर्णयावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी यावेळी ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब उपस्थित होते. यावेळी ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष, शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Uddhav  Thackeray on Supreme Court Final Decision
Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ; ९९ अधिकाऱ्यांच्या बदल्या..

ठाकरे म्हणाले, न्यायालयाच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांच्या खोटा चेहरा कोर्टानं उघड केला आहे. सध्या बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे," "सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही जणांनी आनंद साजरा केला. फटाके फोडले. मी भाजपचे समजू शकतो. पण गद्दारांनी फटाके फोडण्याचे कारण का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

या प्रकरणावर न्यायालयानं अचूक भाष्य केलं आहे. मी राजीनामा दिल्या नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे, पण विश्वासघातकी लोकांसोबत मुख्यमंत्री राहण्याची माझी इच्छा नाही. मला मुख्यमंत्री पदात स्वारस्थ नाही. मी माझ्या निर्णयावर आजही समाधानी आहे,"

Uddhav  Thackeray on Supreme Court Final Decision
ShivSena SC Hearing : सत्तेसाठी आत्मा विकण्याचे धाडस यापुढे कोणी करणार नाही ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

आत्ताचे अस्तिवात असलेले सरकार बेकायदेशीर आहे. शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. या सरकारला मिळालेले जीवनदान तात्पुरतं आहे. मी नैतिकतेनुसार राजीनामा दिला, या सरकारनेही नैतिकतेनुसार राजीनामा दिला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

राज्यातील सत्तासंघर्षांमुळे राज्याची जगात बदनामी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशात चुकीचा कारभार होत आहे. हे देशाला शोभत नाही. बदनामी करणाऱ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर घालावा, असे ठाकरेंनी सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com