Breaking! 27 सप्टेंबर पर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Political Crises| महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु झाली आहे
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court NewsSarkarnama

मुंबई : 27 सप्टेंबर पर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालय आयोगाला दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २७ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाच्या अधिकारांबाबत २७ सप्टेंबरला निर्णय घेतला जाईल. तसेच, दस्यांच्या अपात्रेबाबत १० मिनिटे सुनावणी घेणार असल्याचे घटनापीठाने सांगितले.

दरम्यान, शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाचे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी केली. मात्र न्यायालायाने या सर्व बाबींवर २७ सप्टेबरलाच सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कोणत्या गटाला 'खरा' शिवसेना पक्ष म्हणून मान्यता द्यायची आणि 'धनुष्य-बाण' चिन्हाचे वाटप करायचे की नाही, यावर भारतीय निवडणूक आयोगाने 27 सप्टेंबरला विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News
Thackeray vs Shinde : महाराष्ट्र सत्‍तासंघर्ष ; आज सुनावणीची शक्यता, काय होणार ?

शिवसेनेतील दोन गटांचा वाद शिगेला पोहोचला आहे. राज्यातील राजकीय संकटात शिवसेना (shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट (Shinde Group) यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज (बुधवारी) सुनावणी पार पडली.

एकीकडे आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे, खरी शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर शेवटची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी झाली होती. पुढील सुनावणी घटनापीठासमोर होईल, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीला तारीख मिळाली नाही.

शिंदे गटाचे यांचे वकील नीरज किशन कौल यांच्या तत्काळ सुनावणी अर्जावर सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्या. रवींद्र भट्ट यांच्या पीठाने सांगितले की, बुधवारी प्रकरणाची सुनावणी होऊ शकते. कौल म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पाहता त्यावर त्वरित उपाय आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com